दानवे-शिरसाटांमध्ये पुन्हा वाक्‌युद्ध सुरू!, दानवे म्हणाले, झुकेंगा नही साला..., शिरसाट म्हणाले, हसं करून घेताहेत...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) :  महापालिका निवडणुकीतही ठाकरे गटाचे आ. अंबादास दानवे आणि शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्यात वाक्‌युद्ध सुरू झाले आहे. ठाकरे गटाच्या उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यासाठी धमकावले जात असल्याचा आरोप आ. दानवे यांनी केला. त्यावर मंत्री शिरसाट यांनी ‘ठाकरे गटाला उमेदवारच मिळत नव्हते. अशा उमेदवारांना कोण आणि कशासाठी धमकावणार?’ असे प्रत्युत्तर दिले.

मंत्री शिरसाट यांच्या कन्या हर्षदा या प्रभाग १८ अ मधून तर प्रभाग २९ अ मधून पूत्र सिद्धांत हे निवडणूक लढत आहेत. त्यांच्यासमोर प्रभाग १८ अ मध्ये ठाकरे गटाच्या रुपाली विक्रम वाहूळ, भाजपच्या मयुरी बरथुने तर प्रभाग २९ अ मध्ये किशोर साबळे तर भाजपचे भगवान गायकवाड हे निवडणूक रिंगणात आहेत.

दानवे काय म्हणाले?
आ. अंबादास दानवे यांनी ‘एक्स’वर झुकेंगा नही साला’, अशी टॅगलाइन व्टिट केली. ते म्हणाले, की ठाकरे गटाच्या उमेदवांना मंत्री धमकावत असून दबाव आणत आहेत. मंत्रीच नव्हे तर प्रशासनातील अधिकारीही उमेदवारी मागे घेण्यासाठी फोनाफोनी करत आहेत. निवडणुकीत ही पद्धत पहिल्यांदाच पाहतोय, असा आरोप आ. दानवे यांनी केला. आमच्याकडेही खाते पुस्तक आहे. हिशेब ठेवला जाईल आणि व्याजासह परतफेड नक्की करू. आपले काम आणि नितीमत्ता विसरणाऱ्यांचा बाजार उठवू, असा इशाराही आ. दानवे यांनी दिला.
मंत्री शिरसाट यांचे प्रत्युत्तर...
ठाकरे गटाला उमेदवार मिळत नव्हते. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक अधिकारी कार्यालयासमोर बसून त्यांनी पक्षाचे बी फॉर्म येईल त्याला दिले. अशा उमेदवारांना कोण आणि कशासाठी धमकावणार? दानवे यांचे व्टिट हास्यास्पद आहे. असे करून ते आपलेच हसे करून घेत आहेत, असे मंत्री शिरसाट म्हणाले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार?

Latest News

मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार? मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार?
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धरण उशाला अन्‌ कोरड घशाला ही म्हण दर उन्हाळ्यात छत्रपती संभाजीनगरकरांच्या बाबतीत खरी ठरते....
ऑर्केस्ट्रामध्ये काम, खासगी कंपनीत नोकरी... आयुष्याशी संघर्ष हरला २९ वर्षीय तरुण!; चौका घाटात घेतला गळफास, पैठण, वैजापूर तालुक्यातही मजूर, शेतकऱ्याची आत्महत्या
लाचखोर पोलीस अंमलदाराला ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा!, छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालयाचा आदेश
८० वर्षांच्या वृद्धेवर ५४ वर्षांच्या पुरुषाचा लैंगिक अत्याचार, सोयगावची खळबळजनक घटना
Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software