यंत्रणेच्या चुकांवर आयुक्तांचे पांघरुण, जी. श्रीकांत म्हणाले, ऐनवेळच्या गोंधळापेक्षा आजचा गोंधळ बरा! २५ हजार मतदारांची नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेल्याची कबुली

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिका निवडणूक विभागातील यंत्रणेच्या चुकांवर आयुक्‍त जी. श्रीकांत यांनी चक्क पांघरुण घातल्याचे मंगळवारी (२ डिसेंबर) दिसून आले. ऐनवेळच्या गोंधळापेक्षा आजचा गोंधळ बरा. चुकीने २५ हजार मतदारांची नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेल्याची कबुली देताना त्यांनी ते दुरुस्त करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. मतदार याद्या शुद्ध राहतील, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे जी. श्रीकांत म्हणाले. हा घोळ घालणाऱ्या दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांना एकप्रकारे त्यांनी पाठिशी घातल्याचेच दिसून येत आहे.

मतदार याद्यांवर आजवर तब्बल ४ हजार ३४४ आक्षेप दाखल झाले आहेत. १९०४ आक्षेप निकाली काढले असून, २१०५ आक्षेपांवर अद्याप काम सुरू असल्याचे सांगून जी. श्रीकांत म्हणाले, की ११ लाख मतदारांची फोड करताना काही मतदार नजरचुकीने अलीकडच्या प्रभागात किंवा पलीकडच्या प्रभागात दर्शविले गेले. आपल्याकडे दुरुस्तीसाठी वेळ आहे. युद्धपातळीवर दुरुस्ती केली जात आहे. प्रभाग २६ मधील मतदारांनी मोर्चा काढण्याचा इशारा दिला. मात्र अद्याप सूचना, हरकती व आक्षेप दाखल करण्याची संधी आहे. त्यानंतरही सुधारणा झाली नाही तर नागरिकांनी मोर्चा काढण्याची भाषा करावी, असे जी. श्रीकांत म्हणाले.

रावसपुरा ग्रामपंचायतीचे काही गट महापालिकेच्या हद्दीत येतात. माजी सैनिक कॉलनी महापालिका हद्दीत आहे. त्यामुळे तेथील नावे महापालिकेच्या प्रभागातच राहतील. उर्वरित काही गट महापालिकेच्या हद्दीत दर्शवले असतील तर शहनिशा केली जात आहे. शासनाकडून शहर अभियंता आणि मुख्य अग्‍निशमन अधिकारी भरण्यासाठी प्रस्ताव पाठवल्याची माहितीही त्यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर शहरात प्रथमच प्रभाग रचनेनुसार निवडणूक होत असल्याने आणि त्यातल्या त्यात अनुभवी अधिकारी, कर्मचारी नसल्याने त्यांनी बराच घोळ घालून ठेवल्याचे दिसून येते. तो निस्तरताना, चुकांवर पांघरूण घालताना आयुक्‍तांना प्रयत्न करावे लागत आहे. बुधवारी (३ डिसेंबर) आक्षेप दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...

Latest News

एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला... एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमजीएमजवळ अंधारात लपून बसलेल्या तिघांनी पोलिसांना पाहून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले...
वाळूज एमआयडीसीतील ऑर्किड इंग्रजी शाळेला गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली समज, नियमबाह्य फी वसूल करू नका!
‘तुमच्या मुलीला सुखात ठेवीन...’ प्रॉमिसवर सारिकाच्या आईने ठेवला विश्वास, प्रेमविवाहाला भरला होकार, सोपवला मुलीचा हात!; पण पुढे जे घडलं, ते धक्कादायक... छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोची हृदयद्रावक घटना
अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software