जागा वाटपावरून खेचातानी होणारच. पण मविआ तुटणार नाही; आदित्य ठाकरे यांचा छ. संभाजीनगरात दावा

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आमची लढाई एकमेकांसाठी नाही. कुणी मुख्यमंत्रिपदासाठी लढत नाही. भाजपला हद्दपार करण्यासाठी आम्हाला सरकार बनवायचे आहे, असा दावा ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरात केला. पूरपरिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बुधवारी (४ सप्‍टेंबर) आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे नेते संजय राऊत छत्रपती संभाजीनगरला आले होते. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आमची लढाई एकमेकांसाठी नाही. कुणी मुख्यमंत्रिपदासाठी लढत नाही. भाजपला हद्दपार करण्यासाठी आम्हाला सरकार बनवायचे आहे, असा दावा ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरात केला.

पूरपरिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बुधवारी (४ सप्‍टेंबर) आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे नेते संजय राऊत छत्रपती संभाजीनगरला आले होते. चिकलठाणा विमानतळावर आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, की जागा वाटपावरून खेचातानी होणारच. पण तुटणार नाही. खेचातानीतूनच कुणाची किती ताकद आहे, हे कळते, असे सांगून आदित्य ठाकरे म्हणाले, की भाजप महाराष्ट्र द्वेष्टा आहे. २५६ एकर मिठागाराची जागा अदानीला दिली जात आहे. मुंबई विकायला निघाले आहे.

शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सण येत आहेत. शेतकऱ्यांना मदत देणे गरजेचे आहे. पंचनामे होतील, पण मागच्याप्रमाणे कुठे ५ रुपये, कुठे ५० रुपयांचा चेक, असे होऊ नये, असे ते म्हणाले. तत्‍काळ पंचनामे करून शासनाने मदत द्यावी अन्यथा सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा ठाकरे यांनी दिला. पैठण तालुक्‍यातील पाचोड येथील राजू शेठ, माणिक शेळके यांच्या पिकांची पाहणी ठाकरे यांनी केली. यावेळी आ. अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे उपस्थित होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

"हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!!

Latest News

"हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!! "हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!!
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील रहिवासी सकिना ठाकूर हिने कमालच केली आहे. तिने रूढीवादी विचारसरणीला आव्हान आणि ग्रामीण उद्योजकतेचे एक नवीन...
एफआयआर किंवा कोर्ट केस होऊनही सरकारी नोकरी मिळू शकते का? नियम काय म्हणतात...
स्किन राहील तरुण, सुरकुत्या होतील नाहीशा, घरगुती क्रीम बनवा अन्‌ २ आठवड्यात पहा कमाल!
चार मानवी दोष, जे एखाद्याला यशाच्या मार्गापासून नेतात दूर...
अहंकार अन्‌ निष्काळजीपणामुळेच नंतर माझे चित्रपट चालले नाहीत...; प्रसिद्ध निर्माते-दिग्ददर्शक रामगोपाल वर्मा यांची विशेष मुलाखत
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software