कर्जबाजारी शेतकऱ्याने विहिरीत घेतली जलसमाधी!; कन्नड तालुक्यातील हृदयद्रावक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कन्नड तालुक्यातील नेवपूर येथील परमेश्वर गणपत खेळवणे (वय ५१) या शेतकऱ्याने स्वतःच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (६ डिसेंबर) दुपारी १२ च्या सुमारास उघडकीस आली. अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान आणि कर्जाचा बोजा यामुळे शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले. 

परमेश्वर यांची नेवपूर शिवारातील दोन एकर शेती आहे. हातउसनवारी आणि खासगी कर्ज काढून त्यांनी खरिपात मका लागवड केली होती. ऐन मका काढणीवेळीच अतिवृष्टी होऊन पिकाचे नुकसान झाले. आधीच कर्जाच डोंगर आणि त्यात झालेले असे नुकसान यामुळे ते चिंतित होते. मुलांच्या भविष्याची चिंता पत्नीला बोलून दाखवत होते. शनिवारी दुपारी १२ वाजता त्यांनी स्वतःच्या विहिरीत उडी घेतली. ही बाब पत्नीच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड केल्याने आजूबाजूचे शेतकरी धावून आले. विहिरीत गाळ असल्यामुळे परमेश्वर गाळात रुतले गेले. २ तासांच्या प्रयत्नांनंतर त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. चिंचोली लिंबाजी परिसरात अलीकडच्या काळात ही तिसरी शेतकरी आत्‍महत्‍या आहे. परमेश्वर यांच्यावर शनिवारी रात्री नेवपूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, भावजय, बहीण असा परिवार आहे. याप्रकरणी पिशोर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास केला जात आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

"हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!!

Latest News

"हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!! "हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!!
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील रहिवासी सकिना ठाकूर हिने कमालच केली आहे. तिने रूढीवादी विचारसरणीला आव्हान आणि ग्रामीण उद्योजकतेचे एक नवीन...
एफआयआर किंवा कोर्ट केस होऊनही सरकारी नोकरी मिळू शकते का? नियम काय म्हणतात...
स्किन राहील तरुण, सुरकुत्या होतील नाहीशा, घरगुती क्रीम बनवा अन्‌ २ आठवड्यात पहा कमाल!
चार मानवी दोष, जे एखाद्याला यशाच्या मार्गापासून नेतात दूर...
अहंकार अन्‌ निष्काळजीपणामुळेच नंतर माझे चित्रपट चालले नाहीत...; प्रसिद्ध निर्माते-दिग्ददर्शक रामगोपाल वर्मा यांची विशेष मुलाखत
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software