छ. संभाजीनगरात राज ठाकरे यांचा गंभीर आरोप; मनोज जरांगेंच्या आडून उद्धव ठाकरे अन्‌ शरद पवार कालवताहेत जातीजातीत विष!; मराठा आंदोलक १० तास पोलिसांच्या नजरकैदेत

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मनोज जरांगे यांच्या आडून उद्धव ठाकरे आणि शरद पवार जाती-जातीत विष कालवण्याचे राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज, १० ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरात पत्रकारांशी बोलताना केला. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा राग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. त्‍यांच्यावरील संतापामुळेच हे नेते जातीजातींत द्वेष पसरवत […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मनोज जरांगे यांच्या आडून उद्धव ठाकरे आणि शरद पवार जाती-जातीत विष कालवण्याचे राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज, १० ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरात पत्रकारांशी बोलताना केला. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा राग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. त्‍यांच्यावरील संतापामुळेच हे नेते जातीजातींत द्वेष पसरवत आहेत. पवार वर्षानुवर्षे सत्तेत होते, उद्धव ठाकरेंच्याही हाती सत्तार होती, मग त्‍यांनी मराठा आरक्षण का दिले नाही, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मराठवाडा दौरा केल्यानंतर राज ठाकरे आज सकाळी छत्रपती संभाजीनगरात आले. मनसे पदाधिकाऱ्यांनी त्‍यांचे जोरदार स्वागत केले. त्‍यानंतर राज ठाकरे यांनी जिल्ह्यातील ९ मतदारसंघांचा आढावा घेत पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्‍यानंतर पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्‍हणाले, की विधानसभा निवडणूक जवळ आल्याने शरद पवार आणि उद्धव ठाकरे राज्यातील वातावरण दूषित करत आहेत.

माझ्या धाराशिव आणि बीड येथील दौऱ्यातही त्‍यांच्याच माणसांनी अडचणी आणल्या. माझ्या मराठवाड्यात दौऱ्यात मराठा आरक्षणाला राज ठाकरेंचा विरोध असल्याच्या खोट्या बातम्‍या पसरवल्या गेल्याचा आरोपही राज यांनी करत यात काही पत्रकारही सहभागी असल्याचा दावा केला. माझ्या नादी लागू नका, माझं मोहोळ उठले तर निवडणुकीला एकही सभा घेता येणार नाही, असा इशारा त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना दिला.

मराठा आंदोलकांना घेतले ताब्‍यात
राज ठाकरे छत्रपती संभाजीनगरात येण्यापूर्वीच शहर पोलिसांनी मराठा आंदोलकांची पहाटे पाचपासूनच धरपकड सुरू केली होती. १० तास मराठा आंदोलकांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले. विकीराजे पाटील, पंढरीनाथ गोडसे, ॲड. सुवर्णा मोहिते, भारत कदम यांच्यासह अनेक मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे होते.

राज ठाकरे म्हणाले…
लोकसभेच्या निकालांनंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना वाटत आहे की त्यांना मराठवाड्यात भरघोस मतदान जे झालं ते या दोघांकडे बघून झालं, या दोघांनी हे समजून घेतलं पाहिजे की हे जे मतदान झालं ते नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधातील मतदान झालं. मुस्लिम समाजाने देशभर मोदींच्या विरोधात मतदान इथे किंवा देशभर झालं किंवा दलित बांधवांना संविधान बदलणार असं वाटलं आणि त्यांनी मोदींच्या विरोधात जे मतदान केलं त्यातून हे घडलं आहे. मी मागच्या पत्रकार परिषदेत बोललो तसं संविधान बदलणार हे भाजपचे काही लोकं बोलले आणि त्यातून नरेटिव्ह तयार झालं. काल निदर्शनं करणाऱ्या उद्धव गटाच्या जिल्हाप्रमुखाला आमच्या लोकांनी चांगला चोप दिला आणि तो जाताना ओरडत गेला की एक मराठा लाख मराठा. म्हणजे काय यांना जरांगेच्या आंदोलनाच्या आड स्वतःच विधानसभेचं राजकारण करायच आहे. शरद पवार म्हणतात महाराष्ट्राचा मणिपूर होईल… पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने मणिपूर होऊ नये म्हणून प्रयत्न करायचा तर हेच मणिपूर होईल म्हणत आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी यांना खासकरून मराठवाड्यात दंगली घडवायच्या आहेत. माझी पत्रकारांना पण विनंती आहे की तुमच्यातले जातींचं राजकारण करणारे जे पत्रकार आहेत त्यांना तुम्ही दूर सारलं पाहिजे; कालच्या बीड प्रकरणात तीन पत्रकार सापडलेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

"हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!!

Latest News

"हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!! "हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!!
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील रहिवासी सकिना ठाकूर हिने कमालच केली आहे. तिने रूढीवादी विचारसरणीला आव्हान आणि ग्रामीण उद्योजकतेचे एक नवीन...
एफआयआर किंवा कोर्ट केस होऊनही सरकारी नोकरी मिळू शकते का? नियम काय म्हणतात...
स्किन राहील तरुण, सुरकुत्या होतील नाहीशा, घरगुती क्रीम बनवा अन्‌ २ आठवड्यात पहा कमाल!
चार मानवी दोष, जे एखाद्याला यशाच्या मार्गापासून नेतात दूर...
अहंकार अन्‌ निष्काळजीपणामुळेच नंतर माझे चित्रपट चालले नाहीत...; प्रसिद्ध निर्माते-दिग्ददर्शक रामगोपाल वर्मा यांची विशेष मुलाखत
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software