नवाजुद्दीन सिद्दीकीने लोकांना दिला लग्न न करण्याचा सल्ला, कारण…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया यांचे नाते अनेकदा चर्चेत राहिले आहे. अनेक चढउतारानंतर आता दोघांमध्ये समेट झाला आहे. लग्नाबाबत नवाजुद्दीन उघडपणे बोलला आहे. नुकतेच एका मुलाखतीत नवाजला विचारण्यात आले की, लग्न करावे का, त्यानंतर काहीसे आढेवेढे घेतल्यानंतर तो म्हणाला, तुम्ही करू नये… युट्यूब चॅनलवर रणवीर अलाहाबादियाशी संवाद साधताना नवाजुद्दीन म्हणाला, की मला सांगायचे आहे […]

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया यांचे नाते अनेकदा चर्चेत राहिले आहे. अनेक चढउतारानंतर आता दोघांमध्ये समेट झाला आहे. लग्नाबाबत नवाजुद्दीन उघडपणे बोलला आहे. नुकतेच एका मुलाखतीत नवाजला विचारण्यात आले की, लग्न करावे का, त्यानंतर काहीसे आढेवेढे घेतल्यानंतर तो म्हणाला, तुम्ही करू नये…

युट्यूब चॅनलवर रणवीर अलाहाबादियाशी संवाद साधताना नवाजुद्दीन म्हणाला, की मला सांगायचे आहे पण लोक त्याचा चुकीचा अर्थ लावू शकतात… लोकांनी लग्न करू नये. लग्नाची काय गरज आहे? जर तुम्ही प्रेमात असाल तर लग्नाशिवायही ते फुलू शकते. लग्नानंतर लोक एकमेकांना गृहीत धरू लागतात. तो पुढे म्हणाला की, लग्नानंतर जोडीदारांमधील प्रेम संपुष्टात येते.

तुम्ही एकमेकांशी लग्न केले नसाल तर तुम्ही एकमेकांवर जास्त प्रेम करता. पण लग्नानंतर ते कमी होऊ लागते. मुलं येतात, अनेक गोष्टी घडतात. जर तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल आणि त्यांच्यावर प्रेम करत राहायचे असेल तर लग्न करू नका. नवाज म्हणाला की, समाज आपल्याला २० व्या वर्षी लग्न करण्यास तयार करतो आणि त्यामुळे आपण त्यात आनंदी राहू शकतो असे आपल्याला वाटते. बायको आम्हाला आनंद देईल असं वाटायला लागतं. पण काही काळानंतर तुमच्या कामामुळेच तुम्हाला आनंद मिळतो, असेही तो म्हणाला.

लग्नाचा १४ वा वाढदिवस केला साजरा
काही काळ वेगळे झाल्यानंतर नवाज आणि त्याची पत्नी आलिया मार्चमध्ये पुन्हा एकत्र आले. आलियाने यापूर्वी दावा केला होता की तिने काही वर्षांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. या जोडप्याने त्यांच्या लग्नाचा १४ वा वाढदिवस एकत्र साजरा केला. आलियाने सांगितले की आता त्यांच्यातील मतभेद दूर झाले आहेत. तिसऱ्या व्यक्तीमुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी सुरू झाल्या होत्या. पण आता त्यांनी या समस्या सोडवल्याचं तिने सांगितलं.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

"हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!!

Latest News

"हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!! "हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!!
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील रहिवासी सकिना ठाकूर हिने कमालच केली आहे. तिने रूढीवादी विचारसरणीला आव्हान आणि ग्रामीण उद्योजकतेचे एक नवीन...
एफआयआर किंवा कोर्ट केस होऊनही सरकारी नोकरी मिळू शकते का? नियम काय म्हणतात...
स्किन राहील तरुण, सुरकुत्या होतील नाहीशा, घरगुती क्रीम बनवा अन्‌ २ आठवड्यात पहा कमाल!
चार मानवी दोष, जे एखाद्याला यशाच्या मार्गापासून नेतात दूर...
अहंकार अन्‌ निष्काळजीपणामुळेच नंतर माझे चित्रपट चालले नाहीत...; प्रसिद्ध निर्माते-दिग्ददर्शक रामगोपाल वर्मा यांची विशेष मुलाखत
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software