लग्नाच्या १५ दिवसांतच पती म्हणे माझे आधीही एक लग्न, आपल्या तिघांना एकत्र राहावे लागेल!; २५ वर्षीय तरुणी हादरली!!, बिडकीन पोलिसांनी पतीसह ८ जणांविरुद्ध केला गुन्हा दाखल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : लग्नाच्या १५ दिवसांतच पतीने नववधूला आपले पहिले लग्न झाले असल्याची माहिती दिली. आपल्या तिघांना एकत्र राहावे लागेल, असे सांगितले. ते ऐकून हादरलेल्या तरुणीने जाब विचारला असता तिला त्याने बेदम मारहाण केली. २५ वर्षीय तरुणीने बिडकीन पोलीस ठाणे गाठून पती व सासरच्यांनी केलेल्या जाचाबद्दल सांगितले आहे. त्यावरून पोलिसांनी शुक्रवारी (३१ ऑक्‍टोबर) गुन्हा दाखल केला आहे.

२५ वर्षीय अनयाने (नाव बदलले आहे) या प्रकरणात तक्रार दिली आहे. ती सध्या माहेरी बिडकीनजवळील एका गावात राहते. तिचे लग्न पुण्यातील तरुणासोबत गेल्या १७ ऑगस्टला झाले होते. लग्नानंतर १५ दिवस होऊनही पती तिला काही बोलत नव्हता. एक दिवस पतीने तिला सांगितले, की माझे आधीही एका मुलीशी लग्न झालेले असून, आपल्याला तिघांना एकत्र राहावे लागेल. हे ऐकून अनयाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने पतीला जाब विचारला, की तुम्ही माझ्या आयुष्याचे नुकसान का केले? त्यावर पतीने तिला चापटाने मारहाण केली. सासू-सासऱ्यांना तिने याबाबत विचारले असता त्यांनीही तुला तुझा पती सांगेल तसे ऐकावे लागेल, असे सांगितले. तुझ्या माहेरच्यांना काहीही सांगू नको. नाहीतर तुझा संसार होऊ देणार नाही, असे म्हटले. त्यानंतर सासरच्यांनी तिचा छळ सुरू केला. माहेरावरून बांधकाम व्यवसाय करण्यासाठी २५ लाख रुपये घेऊन ये, असे पतीने तिला धमकावले.

आपल्याला तिघांना सोबत राहायचे आहे, असे म्हणून माझ्या आधीच्या पत्नीशी बोल, असे म्हणून त्याने तिला फोन लावून दिला. पण अनया बोलली नाही. त्यावर पतीने संतापून तू जर माझे ऐकले नाहीस तर मी फाशी घेऊन तुला विधवा करेल, असे धमकावले. त्रास असह्य झाल्याने अनयाने वडिलांना सांगितले. तिच्या वडिलांनी पुण्याला जाऊन तिच्या पती व सासरच्यांना समजावले. मात्र त्यांनी शिवीगाळ करून पैशांची व्यवस्था होत असेल तर इथे थांबा अन्यथा निघून जा, असे म्हणत हाकलून लावले. अनयाला घेऊन तिचे वडील घरी निघून आले. तेव्हापासून अनया आई-वडिलांकडे राहत आहे. तिने बिडकीन पोलीस ठाण्यात पती व सासरच्यांविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी तिचा पती, सासू, सासरे, आजेसासू-सासरे, दीर, पतीचे मामा-मामी अशा ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या

Latest News

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : केकत जळगाव (ता. पैठण) येथील अल्पभूधारक शेतकरी भास्कर बाबुराव मगर (वय ३५) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून...
प्रेम प्रकरणात मदत करत असल्याच्या संशयावरून तरुणावर लोखंडी रॉड, बेल्टने बेदम मारहाण, रोहिदासपुऱ्यातील घटना
दारूच्या नशेत मित्रानेच आवळला मित्राचा गळा!; खुनाचे गूढ २४ तासांत उकलले, बिडकीनजवळील पैठणखेड्याची घटना
Good News : शेंद्र्याजवळील जयपूर एमआयडीसीत महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनी १५० एकरवर साकारणार प्रकल्प!
बौद्ध समाजमंदिरावर चालवला जेसीबी!; पाडळसा उपसरपंचाचे कृत्य, गंगापूर तालुक्यातील खळबळजनक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software