आ. संजनाताई जाधव यांनी अवघे प्रशासन आणले शेतकऱ्यांच्या बांधावर!; पालकमंत्र्यांना कन्नडला बोलावून मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा!!; पालकमंत्री म्हणाले...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

कन्‍नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. अशाप्रसंगी शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण सर्वांनी उभे राहणे गरजेचे असून सरसकट सर्वच ठिकाणी नुकसानीचे पंचनामे करा. त्यासाठी ड्रोन, मोबाईल फोटो यांचे पुरावे ग्राह्य धरा, असे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज, २५ सप्टेंबरला कन्नड येथे दिले.

कन्नडच्या तहसील कार्यालयात पालकमंत्री शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा व करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. कन्नडच्या लोकप्रिय आमदार संजना जाधव, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार विद्याचरण कडवकर, गटविकास अधिकारी ओमप्रकाश रामावत, तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाट तसेच अन्य विभागांचे अधिकारी, सरपंच, ग्रामस्थ, शेतकरी आदी उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांनी झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल सादर केला. त्यानुसार तालुक्यात सरासरीच्या १२३ टक्के पर्जन्यमान झाले आहे. ८ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. १०१ गावांमध्ये शेतीचे नुकसान झाले आहे. १९ हजार २६४ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. २० जनावरे व ४ माणसे दगावली आहेत. कापूस, मका, भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले आहे. अद्याप अनेक ठिकाणी पाणी साचले असल्यामुळे पंचनामे होऊ शकले नाहीत. पंचनामे झाल्यावर नुकसानीचा प्रत्यक्ष अंदाज येईल. शेतकऱ्यांनी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी बैठकीत गाऱ्हाणे मांडले. त्यात प्राधान्याने वन्य प्राण्यांचा उपद्रव, शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ते नसणे, शेताची जमीनच वाहून जाणे, शेतात पाणी तुंबणे आदी समस्यांचा समावेश होता.

आ. संजना जाधव म्हणाल्या की, तालुक्यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन उभे आहे. पंचनामे सगळ्यांचे होतील आणि योग्य ती नुकसान भरपाई मिळेल. शासनाने दिवाळीपूर्वी ही भरपाई द्यावी, अशी मागणीही श्रीमती जाधव यांनी केली. जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, अत्यंत संवेदनशीलपणे प्रशासन काम करीत आहे. दररोज मंडळ, तलाठी स्तरावर आढावा घेण्यात येत आहे. पंचनामे करण्याची प्रक्रिया होत आहे. त्यात स्थानिक अडचणी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंत्रणेला सहकार्य करावे. ही प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पार पाडून शासनाकडून अनुदान प्राप्त होताच मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येईल, असे ते म्हणाले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनीही होत असलेल्या उपाय योजनांची माहिती दिली.

पालकमंत्री शिरसाट यांनी निर्देश दिले की, जिल्हाधिकारी यांनी आपल्यास्तरावरून मंडळ अधिकारी आणि तलाठी यांचा दररोज सायंकाळी ६ वाजता आढावा घ्यावा. शासनाने निर्देश दिल्यानुसार ड्रोन सर्व्हे करा, मोबाईल फोटो व्हिडीओचे पुरावे ग्राह्य धरून पंचनामे करा. वन विभागाने वन्य प्राण्यांचाशेतीतील शिरकाव थांबविण्यासाठी उपाययोजना राबवाव्या. शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याबाबतची प्रक्रिया राबवा. नुकसानीचा अंदाज पाहता सरसकट सगळ्याच शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्या. शेतकऱ्यांच्या पाठीशी या संकटसमयी शासन उभे आहे, असेही त्यांनी या वेळी उपस्थितांना सांगितले. या वेळी पुरात मयत झालेल्या संजय दळे या व्यक्तीच्या वारसांना सानुग्रह अनुदानाचा चार लक्ष रुपयांचा धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला.

पालकमंत्र्यांनी केली तालुक्यातील नुकसानीची पाहणी
पालकमंत्री संजय शिरसाट यांनी कन्नड तालुक्यातील करंजखेड, नेवपूर, घाटशेंद्रा, टाकळी अंतूर आदी ठिकाणी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला. त्यांच्या समवेत आ. संजना जाधव, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार विद्याचरण कडवकर, गटविकास अधिकारी ओमप्रकाश रामावत, तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाट तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक

Latest News

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आ. संजय केणेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
स्मार्टफोनवरील व्हॉल्यूम बटणे केवळ आवाज वाढवणे, कमी करण्यासाठी नाहीत... अनेक कामांसाठीही करू शकतात उपयोग!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software