देवगाव रंगारीच्या सभेत एकनाथ शिंदे म्हणाले, होऊ शकेल तेवढेच बोलतो; योग्य वेळ येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालणारा माणूस आहे. उगाच हवेत विरणारी आश्वासने देत नाही. जो शब्द देतो, तो खरा करून दाखवतो. योग्य वेळ आली की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि लाडक्या बहिणींना २१०० रुपयांची ओवाळणी दिली जाईल. हे माझे वचन असून, ते पूर्ण करून दाखवेल, असा शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवगाव रंगारी येथील सभेत दिला.

कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथील लासूर स्टेशन रोडवर शिंदे यांची सभा पार पडली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली ही सभा नियोजित वेळेपेक्षा उशिरा पार पडली. तरीही शिंदे यांच्या भाषणाच्या उत्सुकतेपोटी परिसरातील नागरिक थांबले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या सभेपूर्वी त्यांच्या हेलिकॉप्टरने हेलिपॅडची चक्कर मारून पडताळणी केली. यामुळे सभेला उशीर झाल्याचे सांगण्यात आले. शिंदे सभास्थानी दाखल झाल्यानंतर सर्वात प्रथम अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर शिंदे यांनी सत्काराचा एकही हार स्वीकरला नाही. आजचा दिवस सत्काराचा नव्हे तर कामाचा आहे, असे ते म्हणाले.

यानंतर भाषण सुरू केल्यावर शिंदे म्हणाले की, कुणाचीही सत्ता कायम राहत नाही. सत्ता येते आणि जाते. पण लोकांसाठी केलेले काम नेहमी सगळे लक्षात ठेवतात. पण एकदा नाव गेले की ते परत मिळवता येत नाही, असे बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. मी त्यांचा विचार घेऊनच पुढे निघालो आहे. त्यामुळेच मी फक्त पूर्ण करता येतील एवढीच आश्वासने देतो. वॉटरग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्याचा दुष्काळ संपविण्याचा निर्धार आमच्या सरकारने केला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी कधीच पैसे कमी पडू दिले जाणार नाहीत. उलट लाडक्या बहिणींना दर महिन्याला दिली जाणारी ओवाळणीची रक्कम वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. योग्य वेळ येताच ही ओवाळणी १५०० रुपयांवरून २१०० रुपये केली जाईल. आमदार संजना जाधव या माझी लाडकी बहीण असून, त्यांच्या माध्यमातून कन्नड तालुक्याचा विकासाचा अनुशेष भरून काढण्याचा शब्द मी या निमित्ताने देत आहे, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पैठणमध्ये भुमरे विरोधकांना रावसाहेब दानवेंचे बळ; वर्चस्व मोडीत काढण्याचा प्रयत्न!

Latest News

पैठणमध्ये भुमरे विरोधकांना रावसाहेब दानवेंचे बळ; वर्चस्व मोडीत काढण्याचा प्रयत्न! पैठणमध्ये भुमरे विरोधकांना रावसाहेब दानवेंचे बळ; वर्चस्व मोडीत काढण्याचा प्रयत्न!
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लोकसभा निवडणुकीनंतर शांत असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांची पैठणमधील...
विद्यापीठाकडून पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात : भरधाव ऑटोरिक्षा नादुरुस्त टेम्पोला धडकली, २ ठार, २ गंभीर जखमी
मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड, छत्रपती संभाजीनगरची घटना
राठोड, काळे, चव्हाण अन्‌ मुलतानी... सोयगावच्या दोन गटांत रंगली राजकीय वारसांमध्ये लढाई!; मतदार कोणाच्या पाठिशी राहणार?
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software