छ. संभाजीनगरात अतिवृष्टीचा आणखी एक बळी : कोबीचे पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्याने शेतातच घेतला गळफास!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने ) : अतिवृष्टीचा आणखी एक बळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेला आहे. त्यांच्या शेतातील पिकात पाणी साचले आहे. कोबीचे पीक काढणीला आले असताना हे संकट ओढावल्याने शेतकरी हादरून गेला. त्यांच्या मुलाचे एमबीबीएसचे शिक्षण सुरू आहे. त्याची फीस कशी भरावी, अशी चिंता त्यांना लागली आणि त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी आणि शासन-प्रशासनाच्या डोळ्यांत अंजन घालणारी घटना मंगळवारी (३० सप्टेंबर) पहाटे बकापूर- पळशी (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे समोर आली.

मधुकर सर्जेराव पळसकर (रा. ५४, रा. बकापूर ) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. छत्रपती संभाजीनगर शहरापासून जवळच असल्याने पळसकर हे भाजीपाल्याचे पीक घेत होते. सध्या त्यांच्या शेतातील कोबीचे पीक काढायला आले होते. त्यातच गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचले. त्यांचा मुलगा हैदराबाद येथे एमबीबीएसचे शिक्षण घेतो. पळसकर यांच्यावर एका राष्ट्रीयीकृत बँकेचे कर्ज आहे. हे कर्ज फेडण्याची चिंता, त्यात मुलाची एमबीबीएसची फीस कशी भरायची, या चिंतेने त्यांना घेरले.

त्यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला मध्यरात्री गळफास घेतला. ही बाब मंगळवारी पहाटे समोर आली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली आणि मुलगा असा परिवार आहे. यापूर्वी अतिवृष्टीमुळे कपाशीचे पीक वाया गेल्याने कायगाव (ता. गंगापूर) येथील बाबासाहेब लक्ष्मण वायसळ (वय ४८) या शेतकऱ्याने गळफास घेऊन राहत्‍या घरात आत्‍महत्‍या केल्याची घटना शुक्रवारी (६ सप्‍टेंबर) घडली होती. जिल्ह्यात अतिवृष्टीचा हा दुसरा बळी गेला असून, शासन-प्रशासनाकडून तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून दिलासा देण्याची मागणी होत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या

Latest News

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : केकत जळगाव (ता. पैठण) येथील अल्पभूधारक शेतकरी भास्कर बाबुराव मगर (वय ३५) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून...
प्रेम प्रकरणात मदत करत असल्याच्या संशयावरून तरुणावर लोखंडी रॉड, बेल्टने बेदम मारहाण, रोहिदासपुऱ्यातील घटना
दारूच्या नशेत मित्रानेच आवळला मित्राचा गळा!; खुनाचे गूढ २४ तासांत उकलले, बिडकीनजवळील पैठणखेड्याची घटना
Good News : शेंद्र्याजवळील जयपूर एमआयडीसीत महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनी १५० एकरवर साकारणार प्रकल्प!
बौद्ध समाजमंदिरावर चालवला जेसीबी!; पाडळसा उपसरपंचाचे कृत्य, गंगापूर तालुक्यातील खळबळजनक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software