पानटपरीचालकाचा चाकूने भोसकून खून, मदतीसाठी धावलेल्या फळविक्रेत्‍यालाही भोसकले!; फुलंब्रीतील थरार, हर्सूलच्या ८ तरुणांचे कृत्‍य

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : किरकोळ वादातून छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सूलच्या ८ तरुणांनी पानटपरी चालकाचा चाकूने भोसकून खून केला. त्‍याला वाचवायला धावलेल्या फळविक्रेत्‍या तरुणावरही चाकूचे वार केले. यात तो गंभीर जखमी आहे. ही घटना फुलंब्री शहरातील महात्‍मा फुले चौकात (टी पॉईंट) शुक्रवारी (२३ ऑगस्ट) सायंकाळी साडेपाचला घडली. घटनेनंत शहरात तणाव निर्माण झाला होता. महात्‍मा फुले चौकातील […]

फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : किरकोळ वादातून छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सूलच्या ८ तरुणांनी पानटपरी चालकाचा चाकूने भोसकून खून केला. त्‍याला वाचवायला धावलेल्या फळविक्रेत्‍या तरुणावरही चाकूचे वार केले. यात तो गंभीर जखमी आहे. ही घटना फुलंब्री शहरातील महात्‍मा फुले चौकात (टी पॉईंट) शुक्रवारी (२३ ऑगस्ट) सायंकाळी साडेपाचला घडली. घटनेनंत शहरात तणाव निर्माण झाला होता. महात्‍मा फुले चौकातील सर्व दुकाने बंद करण्यात आली. मोठा जमाव चौकात जमला होता.

नजीर खान मुनीर खान (वय २४) असे खून झालेल्याचे तर शेख सुलतान शेख लड्डू (वय ३२, दोघे रा. फुलंब्री) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शुक्रवारी फुलंब्री शहरातील राममंदिर परिसरात लग्न होते. त्‍यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल येथून दुचाकींवर आठ तरुण आले होते. सायंकाळी साडेपाचला ते महात्‍मा फुले चौकातील पानटपरीवर गेले. तेथे बार घेण्यावरून पानटरीचालक नजीरसोबत त्यांचा वाद झाला. वाद वाढत जाऊन तरुणांनी नजीरवर चाकूने वार करायला सुरुवात केली. जवळच असलेला फळविक्रेता शेख सुलतान त्‍याच्या मदतीला धावून आला. तरुणांनी त्‍यालाही भोसकले. त्यानंतर तरुण पळून जात असताना नागरिकांनी त्‍यांना पाठलाग करू पकडले व चोप दिला. त्‍याचवेळी तिथून जाणाऱ्या पोलिसांनी हल्लेखोरांना जमावाच्या तावडीतून सोडत फुलंब्री पोलिसांच्या ताब्‍यात दिले.

या प्रकरणात फुलंब्री पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा सचिन अण्णासाहेब पल्हाळ, आर्यन सुरेंद्र भालेराव, सागर मिलिंद शिंदे, पवन मोहन खडसान, गोकूळ भादवे, अजिंक्य रवी साळवे, अमोल जाधव, एक अनोळखी (सर्व रा. हर्सूल) अशा ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय सहाणे करीत आहेत. या तरुणांनी शहरातील एका परमिट रूममध्ये दारू पिल्यानंतर तेथेही काही जणांशी हुज्‍जत घातली होती. नंतर ते महात्‍मा फुले चौकात आले आणि नजीरसोबत त्‍यांचा वाद झाला. शेख सुलतानवर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

"हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!!

Latest News

"हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!! "हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!!
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील रहिवासी सकिना ठाकूर हिने कमालच केली आहे. तिने रूढीवादी विचारसरणीला आव्हान आणि ग्रामीण उद्योजकतेचे एक नवीन...
एफआयआर किंवा कोर्ट केस होऊनही सरकारी नोकरी मिळू शकते का? नियम काय म्हणतात...
स्किन राहील तरुण, सुरकुत्या होतील नाहीशा, घरगुती क्रीम बनवा अन्‌ २ आठवड्यात पहा कमाल!
चार मानवी दोष, जे एखाद्याला यशाच्या मार्गापासून नेतात दूर...
अहंकार अन्‌ निष्काळजीपणामुळेच नंतर माझे चित्रपट चालले नाहीत...; प्रसिद्ध निर्माते-दिग्ददर्शक रामगोपाल वर्मा यांची विशेष मुलाखत
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software