- News
- जिल्हा न्यूज
- तक्रार निवारण दिवस, दिवसभर चालले कामकाज
तक्रार निवारण दिवस, दिवसभर चालले कामकाज
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यामध्ये 22 जुलै) हा दिवस तक्रार निवारण दिवस म्हणून पाळण्यात आला. यानिमित्त नागरिकांच्या प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालयामध्ये दिवसभर कामकाज सुरु होते. जिल्ह्यातील सर्व तहसील, उपविभागीय कार्यालयामध्ये नागरिकांची उपस्थिती होती. तक्रार निवारण दिनात शी नागरिकांना समक्ष बोलावून त्यांच्या समोर तात्काळ निपटारा […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यामध्ये 22 जुलै) हा दिवस तक्रार निवारण दिवस म्हणून पाळण्यात आला. यानिमित्त नागरिकांच्या प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालयामध्ये दिवसभर कामकाज सुरु होते. जिल्ह्यातील सर्व तहसील, उपविभागीय कार्यालयामध्ये नागरिकांची उपस्थिती होती. तक्रार निवारण दिनात शी नागरिकांना समक्ष बोलावून त्यांच्या समोर तात्काळ निपटारा करण्यात आला.
महसुल शाखेतील एकूण 332 प्राप्त तक्रारीत 172 तक्रारीच निराकरण करण्यात आले. शिल्ल्क तक्रारीत 5 रस्ते प्रकरण स्थळी पाहणी नोटिस काढल्या. 3 तडजोड आधारे प्रकरणे निकाली काढण्यात आले. 169 प्रकरणात तहसिलदार स्तरावर मंजुरी देऊन समाविष्ट तयार करण्यासाठी Login ला पाठवण्यात आले आहे.
पुरवठा विभागाच्या 11 प्राप्त तक्रारीत 11 निराकरण करण्यात आल्या, रेशनकार्ड मध्ये नाव समाविष्ट करण्यात आले. संजय गांधी निराधार योजना 33 प्राप्त तक्रारी 18 तक्रारीचे निराकरण करण्यात आल्या. 18 प्रकरणात अनुदान वाटप झाले आहे. 15 प्रकरण नविन असून 29 जुलै 2024 रोजी बैठक ठेवण्यात आली आहे. त्यात निर्णय घेण्यात येणार आहे. संकीर्ण शाखेत सततच्या पावसाचे अनुदान प्राप्त नसल्याचे तक्रारी निराकरण 42 तक्रारी VK नंबर जनरेट करण्याबाबत मंत्रालयात पाठपुरावा केला आहे.
त्याही तक्रारीची नोंद घेऊन स्थळ पाहणीसाठी साठी ठेवण्यात आलेले आहेत.
फुलंब्री तहसिल कार्यालयात 12 पैकी 11 तक्रारी निकाली काढण्यात आल्या.
सोयगाव तहसील कार्यालयात एकूण 25 तक्रारी नोंदवल्या गेल्या. पैकी 17 तक्रारीचे निवारण करण्यात आले.
गंगापूर तहसील कार्यालयात 33 नागरिक तक्रार निवारण दिवसात उपस्थित होते. तक्रार निवारण दिनात सर्वसामान्यांना येणाऱ्या अडचणीचे निवारण करुन महसुल प्रशासनाने दिलासा देण्याचे काम केले आहे.
जिल्हाभरात विविध कार्यालयामध्ये तक्रार निवारण दिनानिमित्त तक्रारीचे निवारण करण्यात आले,असे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी सांगितले.

