- News
- सिटी डायरी
- जागर स्त्रीशक्तीचा : सशक्त समाज निर्मितीत महिलांची भूमिका मोलाची, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आव...
जागर स्त्रीशक्तीचा : सशक्त समाज निर्मितीत महिलांची भूमिका मोलाची, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : समाजाची प्रगती होत असताना हा समाज वैचारीक, सांपत्तिक आणि आरोग्यदृष्ट्या सशक्त असणे आवश्यक असते. कुटुंब सांभाळणारी महिला संस्कार करून आपले कुटूंब आणि पर्यायाने समाज सशक्त बनवत असते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज, २४ सप्टेंबरला केले.
शिक्षणासोबत वैचारिक प्रगल्भता महत्वाची. नवदुर्गा व त्यांचे माहात्म्य हे आजच्या स्त्री मध्येही आहे. त्यामुळेच आपण सशक्त समाजनिर्मितीत करू शकता, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात महिला शिक्षकांच्या आरोग्य तपासणीने झाली. कार्यशाळेसाठी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, तसेच खासगी अनुदानित शाळांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व महिला शिक्षकांची उपस्थिती होती. या वेळी राज्य पुरस्कार विजेत्या शिक्षकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक प्रभारी गटशिक्षणाधिकारी मनीषा वाशिंबे यांनी केले. सूत्रसंचालन विस्तार अधिकारी कल्पना पदकोंडे यांनी केले. आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी धनराज कांबळे यांनी केले.

