चांगली बातमी : बँक खात्यासह लॉकर अन्‌ सुरक्षित कस्टडीसाठी आता ठेवू शकता चार नॉमिनी; एक नोव्हेंबरपासून होणार सोय!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : बँक खातेदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या खात्यातील पैसे किंवा लॉकरमधील वस्तू आपल्यालाच मिळाव्यात, यावरून त्याच्या नातेवाईकांमध्ये होणाऱ्या वादांवर अखेर सरकारने तोडगा काढला आहे. एक नोव्हेंबरपासून बँकांच्या नियमांमध्ये बदल होत असून, यानुसार बँक खातेदार त्यांच्या खात्यासह लॉकर आणि सुरक्षित कस्टडीसाठी एक नव्हे तर चार जणांना नामांकित करू शकणार आहेत.

एक नोव्हेंबरपासून बँकिंग कायद्यात बदल होत असून यासंदर्भात सरकारने एक अधिसूचना जारी केली आहे. याआधी बहुतांश बँकांमध्ये खातेदारांना फक्त एका व्यक्तीला नॉमिनी करण्याची परवानगी होती. परंतु, आता बदललेल्या नियमानुसार खातेदार चार जणांना नॉमिनी करू शकणार आहेत. एवढेच नव्हे तर आपल्या खात्यातील किंवा लॉकरमधील किती टक्के रक्कम कोणत्या नॉमिनीला मिळावी याचा निर्णयही बँक खातेदार घेऊ शकणार आहे. अर्थात, एखाद्या खातेदाराने नामांकित केलेला पहिल्या क्रमांकाचा व्यक्ती पात्र नसेल तर दुसरा नामांकित व्यक्ती त्याची जागा घेऊ शकेल.

हीच पद्धत लॉकर आणि सुरक्षित कस्टडीसाठी देखील लागू असेल. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, बँकांच्या नियमांमध्ये एक तारखेपासून बदल लागू होत आहे. हा कायदा एप्रिल २०२५ मध्ये अधिसूचित करण्यात आला असून एकंदरीत १९ दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. रिझर्व बँक ऑफ इंडिया कायदा १९३४, बँकिंग नियमन कायदा १९४९, स्टेट बँक ऑफ इंडिया कायदा १९५५, बँकिंग कंपन्या कायदा १९७० आणि १९८० अशा एकूण  पाच कायद्यांमध्ये या दुरुस्त्या करण्यात आले आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवेंवर सौदेबाजीचा आरोप, जि. प. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत सदस्यांचा केला १८ कोटींना सौदा, ४ कोटी स्वतः हडपले... ‘या’ सदस्याच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

Latest News

अंबादास दानवेंवर सौदेबाजीचा आरोप, जि. प. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत सदस्यांचा केला १८ कोटींना सौदा, ४ कोटी स्वतः हडपले... ‘या’ सदस्याच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ अंबादास दानवेंवर सौदेबाजीचा आरोप, जि. प. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत सदस्यांचा केला १८ कोटींना सौदा, ४ कोटी स्वतः हडपले... ‘या’ सदस्याच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ
वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यावर शिऊर गटाचे जिल्हा परिषद सदस्य संजय निकम यांनी गुरुवारी...
औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!;
मोठी कारवाई : फुलंब्री शहरात ६ गायींची कत्तल, ८ गायींना वाचवले!; छत्रपती संभाजीनगरहून पोलिसांची टीम गेली, फुलंब्री पोलिसांना दाखवला ‘आरसा’!!
भररस्त्यात उभी केली क्रूझर, पोलिसांना म्हणाला, "हम नगरसेवक पठाण के लोगा, सबकी वर्दी उतरवा दूँगा...’, हर्सूल टी पॉइंटवर दोघांनी कहरच केला..!, पठाण म्हणाले, माझा त्यांच्याशी काही संबंध नाही... 
दरवाढ, युद्धाचे सावट, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही छत्रपती संभाजीनगरच्या सराफा बाजारात मंदी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software