लई भारी… शेतकरी स्वतःच व्यापारी झाले अन्‌ विकला ४२ लाखांचा माल!; छत्रपती संभाजीनगरात घडली ही किमया…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नाबार्ड, लघु शेतकरी कृषी संघ आणि खुले डिजीटल वाणिज्य संस्थान (ओएनडीसी) यांच्या वतीने शेतकरी उत्पादक कंपनी निर्मित कृषी उत्पादनांच्या प्रचार, प्रसार आणि विक्रीसाठी ‘तरंग : शेतकरी उत्पादक कंपन्यांचा मेळावा’ शनिवार (२७ जुलै) ते सोमवार (२९ जुलै) दरम्यान आयोजित केला होता. या तीन दिवसीय मेळाव्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांनी उत्पादन केलेल्या ४२ […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नाबार्ड, लघु शेतकरी कृषी संघ आणि खुले डिजीटल वाणिज्य संस्थान (ओएनडीसी) यांच्या वतीने शेतकरी उत्पादक कंपनी निर्मित कृषी उत्पादनांच्या प्रचार, प्रसार आणि विक्रीसाठी ‘तरंग : शेतकरी उत्पादक कंपन्यांचा मेळावा’ शनिवार (२७ जुलै) ते सोमवार (२९ जुलै) दरम्यान आयोजित केला होता. या तीन दिवसीय मेळाव्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांनी उत्पादन केलेल्या ४२ लाख ५० हजार रुपयांच्या मालाची विक्री झाली.

उद्‌घाटनप्रसंगी नाबार्डचे महाप्रबंधक प्रदीप पराते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक डी. एम. कावेरी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश केदार, बँक ऑफ महाराष्ट्रचे उपमहाव्यवस्थापक विवेक, नाबार्डचे जिल्हा प्रबंधक सुरेश पटवेकर आदी उपस्थित होते. मेळाव्यात शेतकरी बांधवांना तीनही दिवस बँकर्स, स्मार्ट योजना, पशुसंवर्धन योजना, ॲग्रो स्टार्ट अप आणि सायन्स फॉर सोसायटी, कंपनी कायदा या विषयांवर मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.

मेळाव्यात छत्रपती संभाजीनगर,जालना, नांदेड, बीड, सातारा, पुणे, नगर, लातूर, वाशिम, कोल्हापूर, नाशिक जिल्ह्यातील एकूण ४० शेतकरी उत्पादक कंपन्यांचे उत्पादन विक्री स्टॉल लावण्यात आले होते. हळद, मिरची पावडर, ज्वारी, बाजरी, खपली गहू, डाळ, तांदूळ, मध, तेल, चंदन उत्पादने, अगरबत्ती, खत असे अनेकविध सेंद्रिय आणि इतर उत्पादने मोठ्या प्रमाणावर विक्री झाले. त्यातून शेतकरी उत्पादक कंपन्यांना ४२ लाख ५० हजार रुपये मिळाले, असे आयोजकांनी सांगितले. मेळाव्यात कृषी विभाग, बँक, पशुसंवर्धन विभाग, शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली. शहरवासियांचा चांगला प्रतिसाद लाभला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

"हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!!

Latest News

"हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!! "हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!!
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील रहिवासी सकिना ठाकूर हिने कमालच केली आहे. तिने रूढीवादी विचारसरणीला आव्हान आणि ग्रामीण उद्योजकतेचे एक नवीन...
एफआयआर किंवा कोर्ट केस होऊनही सरकारी नोकरी मिळू शकते का? नियम काय म्हणतात...
स्किन राहील तरुण, सुरकुत्या होतील नाहीशा, घरगुती क्रीम बनवा अन्‌ २ आठवड्यात पहा कमाल!
चार मानवी दोष, जे एखाद्याला यशाच्या मार्गापासून नेतात दूर...
अहंकार अन्‌ निष्काळजीपणामुळेच नंतर माझे चित्रपट चालले नाहीत...; प्रसिद्ध निर्माते-दिग्ददर्शक रामगोपाल वर्मा यांची विशेष मुलाखत
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software