औरंगाबाद खंडपीठाने बजावले : दोन्ही टप्प्यांतील निवडणुकांचा निकाल २१ डिसेंबरलाच घोषित करा, सुस्पष्ट नियमावलीसाठी १० आठवड्यांची दिली मुदत, एक्झिट पोल, भाष्य नको!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ऐन मतदानाच्या तोंडावर घोळ घातल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मंगळवारी (२ डिसेंबर) राज्य निवडणूक आयोगाला चांगलेच खडसावले आहे. नगरपालिका, नगरपंचायतीच्या २ डिसेंबर आणि २० डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकांचा निकाल २१ डिसेंबरलाच घोषित करण्याचे आदेश दिले आहेत. मतदानासंदर्भात कोणत्याही प्रकारचे एक्झिट पोल अथवा भाष्य करू नये, असे स्पष्ट निर्देशही दिले आहेत. त्यामुळे एक्झिट पोलचा परिणाम २० डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीवर होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीत दुसरा टप्पा आला आहे. काही ठिकाणी पूर्ण नगरपालिका, नगरपंचायती तर काही ठिकाणी प्रभागांचे मतदान २० डिसेंबरला होऊन २१ डिसेंबरलाच निकाल लागणार आहेत. लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय न्या. विभा कंकणवाडी व न्या. हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठाने दिला आहे. भविष्यात असे घोळ निर्माण होऊ नयेत म्हणून सुस्पष्ट नियमावली दहा आठवड्यांत तयार करण्याचेही निर्देशही निवडणूक आयोगाला दिले. ही नियमावली लगेचच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, मनपा निवडणुकीपूर्वी करावी, असेही खंडपीठाने म्हटले आहे. एक्झिट पोल अथवा भाष्य करण्याबद्दल मनाई केल्याने कोणतेही तर्कवितर्क लावले जाणार नाहीत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!

Latest News

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले! विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विट्स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर लुटारू सापळा लावून थांबलेले असतात. एकटेदुकटे कुणी...
UPSC मध्ये नवीन भरती सुरू, २ लाख रुपयांपर्यंत पगार, नोकऱ्यांसाठी पात्रता जाणून घ्या...
CUET PG करिता रजिस्ट्रेशन सुरू, परीक्षा मार्चमध्ये होणार, या गोष्टी लक्षात ठेवा...
१७,००० रुपयांच्या नोकरीवर मारली लाथ, आता वर्षाकाठी १७ लाखांची करताहेत उलाढाल!
३ दिवसांपासून पोटात अन्न-पाण्याचा कण नाही, वडगाव कोल्हाटीत उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती बिघडली, डॉक्टर म्हणाले, उद्या आणखी बिकट होईल स्थिती...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software