बडोदा बँकेने लाज सोडली!; सिल्लोडमध्ये मुख्यमंत्र्यांचा आदेश डावलून शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या नोटिसा!!

On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांकडील कर्जाची वसुली थांबवावी, असे निर्देश बँकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. हे आदेश डावलून बँक ऑफ बडोदाने शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या नोटिसा पाठविल्याने संताप व्यक्‍त होत आहे. बँकेच्या उंडणगाव शाखेचा हा प्रताप समोर आला असून, या बँकेच्या अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेतकऱ्यांना बजावलेल्या नोटिसांबद्दल बँक शाखा व्यवस्थापक गजानन बैस यांनी निलाजरेपणाची हद्दच गाठली. ते म्हणाले, की शासनाकडून वसुली थांबविण्याचा लेखी आदेश आम्हाला मिळालेला नाही. त्‍यामुळे नोटिसा वकिलामार्फत पाठवलेल्या आहेत. त्‍यामुळे मुख्यमंत्र्यांनी केवळ तोंडीच आदेश दिले आहेत, का जे बँकांपर्यंत पोहोचले नाहीत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अतिवृष्टीमुळे चिंतित शेतकरी कन्हैय्या बसैये (रा. उंडणगाव) यांनी बडोदा बँकेकडून नोटीस आली आहे. त्‍यांच्या शेतातील मका पीक अतिवृष्टीमुळे वाया गेले असून, कर्जाचा डोंगर आणखीनच वाढला आहे. तो कसा फेडायचा, याची चिंता असताना बँकेने नोटीस पाठवली. थकीत कर्ज, त्‍यावरील व्याज व अन्य खर्च अशी रक्‍कम भरण्याची नोटीस आली आहे. त्‍यामुळे आधीच चिंताग्रस्त शेतकरी हादरून गेला आहे.

दरम्‍यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतिवृष्टीचे आणखी दोन बळी गेले आहेत.  सिल्लोड तालुक्‍यातील बनकिन्होळा येथे रामेश्वर पुंडलिक फरकाडे (वय ३४) यांनी सोमवारी (६ ऑक्‍टोबर) राहत्‍या घरात गळफास घेतला, तर छत्रपती संभाजीनगर तालुक्‍यातील माळीवाडा येथील जगन्नाथ रखमाजी आढाव (वय ६०) यांनी मंगळवारी (७ ऑक्‍टोबर) विहिरीत उडी घेऊन आत्‍महत्‍या केली. अल्पभूधारक फरकाडे यांच्या सव्वा एकरातील कापूस आणि मका ही पिके अतिवृष्टीने वाया गेली आहेत. त्‍यांच्या पश्चात आई, पत्‍नी, भाऊ, भावजय असा परिवार आहे. दीड वर्षापूर्वीच लग्‍न झाले होते. अल्पभूधारक शेतकरी आढाव यांच्या १ एकर ३७ आर जमिनीतील पिकांचे नुकसान झाले. त्‍यांच्या पश्चात पत्नी, ३ विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरात महिनाभरात आढळले ८ मृतदेह, ज्यांची ओळख पटली नाही, अशा अवस्थेत होते, की तुम्ही बघूही शकणार नाही...

Latest News

छत्रपती संभाजीनगरात महिनाभरात आढळले ८ मृतदेह, ज्यांची ओळख पटली नाही, अशा अवस्थेत होते, की तुम्ही बघूही शकणार नाही... छत्रपती संभाजीनगरात महिनाभरात आढळले ८ मृतदेह, ज्यांची ओळख पटली नाही, अशा अवस्थेत होते, की तुम्ही बघूही शकणार नाही...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगर शहरात अनोळखी मृतदेह मिळून येण्याचे प्रमाण लक्षणीय ठरत आहे. १ ऑक्‍टोबरपासून...
सामाजिक कार्यकर्तीच्या फेसबुक पोस्टवर अश्लील शिवीगाळीचा भडीमार, पोलिसांनी २३ जणांविरुद्ध केला गुन्हा दाखल, छत्रपती संभाजीनगरातील प्रकार
लई हुशारी केली, पण शेवटी घडा भरलाच!; ‘कायद्या’चा गैरवापर करून लाखो रुपये उकळले, अखेर दुकलीला आता पडल्या बेड्या!!, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण सायबर पोलिसांची कामगिरी, नक्की काय आहे स्टोरी वाचूया... 
मंजूरपुऱ्यातील ‘बॉस पब्लीक चॉईस’ रेडिमेड कपड्यांचे दुकान फोडले, चोरट्यांनी शर्ट-पँट नेले...
गोमटेश मार्केटमध्ये भल्ला चाट भंडारसमोर तरुणांमध्ये हाणामारी!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software