जिल्हा परिषद निवडणूक : धक्का, दिलासा, हसू अन् अश्रू... गट आरक्षण सोडतीनंतर सिल्लोडमधील चित्र!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : आधी कमालीची आतुरता, उत्कंठा अन् नंतर सोडत सुरू झाल्यावर काहींना धक्क्यामागून धक्के, काहींना दिलासा, काहींच्या चेहऱ्यावर हसू तर काहींचे कंठ दाटून आलेले... हे चित्र सोमवारी सिल्लोडमध्ये दिसून आले. निमित्त होते जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांसाठी झालेल्या आरक्षण सोडतीचे.

जिल्हा परिषदेचे सिल्लोड तालुक्यातील अनेक गट राखीव झाल्याने या निवडणुकीसाठी गेल्या चार वर्षांपासून तयारी करून ठेवलेल्या अनेकांचा हिरमोड झाला, तर काहींना दिलासा मिळाला. अंधारी गट सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्याने येथून निवडणुकीची तयारी करून ठेवलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे यांचा भ्रमनिरास झाला. उंडणगाव गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने बाजार समितीचे संचालक दामूअण्णा गव्हाणे यांच्या स्नुषा सीमा गव्हाणे यांचा हिरमोड झाला.

त्याचवेळी डोंगरगाव गट सर्वसाधारण गटासाठी सुटल्याने माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांची कळी खुलली आहे. कारण येथून ते निवडणूक लढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याशिवाय अंभई गट मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. भराडी गट सर्वसाधारण गटासाठी सुटल्याने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीराम महाजन (शिवसेना) किंवा माजी चेअरमन श्रीरंग साळवे यांची कळी खुलली आहे.

घाटनांद्रा गटही सर्वसाधारण गटासाठी सुटल्याने विद्यमान सदस्या तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक गरुड यांच्या पत्नी शिल्पा गरुड यांना दिलासा मिळाला आहे. मात्र येथून लढण्यासाठी उत्सुक असलेले जिल्हा बँकेचे अध्यक्ष अर्जुन गाढे यांच्या पदरी मात्र निराशा पडली आहे. केऱ्हाळा गट सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्याने भाजपचे ज्ञानेश्वर मोठे यांच्या पत्नी अनिता मोठे यांचा रस्ता मोकळा झाला आहे. 

सुरक्षित पं. स. गण शोधासाठी करावी लागणार धावाधाव 
सोमवारी पंचायत समिती गणांसाठी देखील आरक्षण सोडत पार पडली. यामध्ये माजी सभापती ज्ञानेश्वर तायडे (भाजप), माजी सदस्या छाया उबाळे, अनिल खरात, कविता भांबर्डे, शिवसेनेच्या सरिता चव्हाण, कासाबाई गवळे, आसेफमिया देशमुख, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे यांच्या स्नुषा सावित्री लोखंडे यांचे गण राखीव झाले. यामुळे आता या सर्वांना नवीन गणांचा शोध घ्यावा लागेल. अपेक्षेप्रमाणे आरक्षण मिळाल्याने डोंगरगावचे सरपंच निजाम पठाण, शिवना येथील सेनेचे नेते शेख सलीम, कल्पना जामकर, काकासाहेब राकडे यांना संधी निर्माण झाली आहे. धानोरा व केळगाव हे नवे गण निर्माण केले गेले असून, तेथे नवख्या कार्यकर्त्यांना संधी मिळू शकणार आहे.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही...

Latest News

खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही... खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही...
खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : खुलताबाद पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्‍या गटाने चक्‍क भाजपला साथ दिली. ही...
बायको दारू पिण्यासाठी पैसे देत नाही म्हणून नवऱ्याने घर दिले पेटवून!, सिल्लोडची घटना
पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात सहायक फौजदाराने पीडितेच्या पतीला कानशिलात वाजवल्याचा आरोप, जोरात फटका बसल्याने जमिनीवर कोसळला... व्हायरल व्हिडीओचे सत्य काय..?
मित्राच्या घरात आढळला युवकाचा संशयास्पदस्थितीत मृतदेह, बिडकीनजवळील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांना उद्योगमंत्र्यांनी केले आश्वस्त, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार वापरण्याची केली सूचना, उद्योजकांशी बोलताना काय म्हणाले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software