शहराच्या मूळ प्रश्नांना बाजूला ठेवून हिंदू-मुस्लिम मुद्दे पुढे करतात, जलील यांची सत्ताधाऱ्यांवर टीका

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सध्या महापालिका निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले आहे. शहराचा पाणीप्रश्न, विकास हे मुद्दे बाजूला ठेवून सत्ताधारी मंडळी जातीयवादाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवू पाहत असल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी मंत्री संजय शिरसाट यांनी एमआयएम जातीय दंगली घडवू पाहत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता मंत्री नीतेश राणे यांनी एमआयएमचे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा आरोप केला. त्यांना एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्‍तियाज जलील यांनी कठोर शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.

एमआयएमचे पाकिस्तानच्या आयएसआय या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे वाटत असेल तर सरकार तुमचे आहे, चौकशी करा. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा बसतात. त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसतील तर मी विमानाची तिकीटे काढून देतो,  असा टोला त्यांनी राणे यांना लगावला. मूळ प्रश्नांना बाजूला करण्यासाठी हिंदू-मुस्लिम, पाकिस्तान, हिरवा साप, असले मुद्दे पुढे केले जातात. हे आजचा विषय नसून, मागील ३०-४० वर्षांपासून अशीच पद्धत अवलंबली जाते, असा घणाघात जलील यांनी केला आहे. नीतेश राणे, त्यांचे आमदार बंधू नीलेश राणे व त्यांचे खासदार असलेले वडील नारायण राणे यांनी एकत्रित दिल्लीत जाऊन पंतप्रधान, गृहमंत्र्यांकडे मागणी करावी, असे जलील म्हणाले. एमआयएमचा दहशतवादी संघटनांशी संबंध आहे असा समज असेल तर त्याच पक्षाच्या खासदार नेत्याला ‘संसदरत्न’ म्हणून गौरवले जाते, याचाही विचार मंत्री राणेंनी करावा, असे ते म्हणाले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण

Latest News

मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना गुरुवारी (१२ मार्च) दुपारी १ च्या...
वेळीच एअरबॅग उघडल्याने वाचले मुख्याध्यापक देविदास चितळे, नियंत्रण सुटून कार २० फूट खोल चारीत कोसळली!, फुलंब्रीजवळील दुर्घटना
सिडको बसस्थानकावर नाश्ता सेंटरचालकावर चौघांचा हल्ला, जुन्या भांडणावरून रिक्षाचालकाची खुन्नस, दोघे जखमी
करमाडजवळील दुर्घटना : दुभाजकावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू; मागून येणाऱ्या वाहनाने हूल दिली...
१७ वर्षीय मुलीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या, कन्नड तालुक्यातील धक्कादायक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software