- News
- पॉलिटिक्स
- Amit Shaha in Sambhajinagar : मराठवाड्यातील किमान ३० जागा जिंकण्याचा संकल्प!; अमित शहा म्हणाले, मराठ...
Amit Shaha in Sambhajinagar : मराठवाड्यातील किमान ३० जागा जिंकण्याचा संकल्प!; अमित शहा म्हणाले, मराठा आंदोलनाची चिंता करू नका, ते सरकार अन् फडणवीस बघतील!!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मराठा आंदोलनाची चिंता करू नका ते सरकार आणि उपमुख्यमंत्री फडणवीस बघतील. मागच्यावेळी गुजरातेत ३ आंदोलने सुरू होती, तरीही आपण जिंकलो, असे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्रपती संभाजीनगरच्या पदाधिकारी संवाद बैठकीत एकेक जागा जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करा, असे आवाहन केले. एमजीएम कॅम्पसमधील रुक्मिणी सभागृहात मंगळवारी […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मराठा आंदोलनाची चिंता करू नका ते सरकार आणि उपमुख्यमंत्री फडणवीस बघतील. मागच्यावेळी गुजरातेत ३ आंदोलने सुरू होती, तरीही आपण जिंकलो, असे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्रपती संभाजीनगरच्या पदाधिकारी संवाद बैठकीत एकेक जागा जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करा, असे आवाहन केले.


अशी सांगितली ब्लू प्रिंट…
राज्यातील बूथचे ए, बी, सी, डी असे वर्गीकरण करा. भाजपला हमखास विजय मिळणारे बूथ हे ए वर्गात असतील. विरोधी पक्षांचा प्रभाव असलेल्या बूथचे वर्गीकरण बी, सी, डी असे करावे. विरोधकांच्या बूथप्रमुखांना आपलेसे करा. त्यांच्या बूथवर किमान १० टक्के मतदान वाढले पाहिजेत. नवरात्र ते विजयादशमी या सणासुदीच्या दिवसांत जनतेत फिरून संपर्क वाढवा. दुचाकीला झेंडा लावून रॅली काढा. शेतकऱ्यांना भेटून केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती द्या. ऋषी-मुनींचा सन्मान करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. पक्षाच्या सदस्यत्व मोहिमेकडे लक्ष देत सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना पक्षाशी जोडा. पराभूत सरपंचांनाही पक्षात घ्या. बुथ, मंडळ, प्रदेश पातळीवरील कार्यकर्त्यांना व्हॉट्सअॅप ग्रुपशी जोडा. जेथे पक्ष कमकुवत आहे, तेथे शक्तिकेंद्र स्थापन करा. बुथ पातळीवर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना जोडा. बचतगट व स्वयंसहायता गटांच्या बैठका घ्या.
फडणवीस म्हणाले….
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करताना म्हणाले, की लोकसभा निवडणुकीतील नकारात्मकता आता बऱ्यापैकी कमी झालेली आहे. महिला मतदानावर फोकस करा. कारण महिला मतदारांना जात, धर्म, पंथ याच्याशी काही घेणं नसते. ज्यांनी आपल्याला मदत केली आहे, त्यांच्या पाठीशी त्या सदैव राहतात, असे फडणवीस म्हणाले.

