छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे ८० बंडखोर खाताहेत ‘भाव’; अधिकृत उमेदवाराला मोठी ‘झळ’ बसणार!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) :  भाजपकडून उमेदवारी मिळण्याची आस बाळगून असलेल्या निष्ठावंतांच्या तोंडाला स्थानिक नेत्‍यांनी पाने पुसली. त्यामुळे पक्षात मोठे रणकंदन पहायला मिळाले. मात्र अनेक निष्ठावंतांनी बंडखोरीचा झेंडा फडकावत अपक्ष उमेदवारी दाखल केली. भाजपच्या अशा बंडखोरांची संख्या तब्बल ८० च्या घरात आहे. त्यांचे बंड थंड करण्यासाठी पक्षाने नेत्‍यांची ३ पथके स्थापन केली. त्यांनी नाराजांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. पण गुरुवारी (१ जानेवारी) बंडोबांनी त्यांना प्रतिसादच दिला नाही. आज, २ जानेवारीला दुपारी ३ पर्यंतच उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे भाजपच्या प्रयत्नांना किती यश मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागते.

भाजपने अशा अनेकांना उमेदवारी दिली आहे, जे कधी पक्षात सक्रीयच नव्हते. त्याउलट अशा अनेकांना डावलले, ज्यांनी पक्षासाठी दीर्घकाळापासून मेहनत घेतली आहे. शेवटपर्यंत भाजपकडून तिकीट मिळेल, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या काही निष्ठावंतांना उमेदवारी अर्ज भरता आला नाही. त्यांनी प्रचार कार्यालयासमोर केलेला राडा सर्वांनी पाहिला. मात्र ८० जणांनी हुशारी करत अपक्ष अर्ज भरला. या सर्वांची समजूत काढली जात असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याबद्दल विनंती केली जात आहे.

यात पश्चिम मतदारसंघात शिरीष बोराळकर, बसवराज मंगरुळे, प्रवीण घुगे यांची टीम आहे. मध्य मतदारसंघात खा. डॉ. भागवत कराड, आ. संजय केणेकर आणि पूर्व मतदारसंघात स्वतः मंत्री अतुल सावे, शहराध्यक्ष किशोर शितोळे हे बंडखोरांची समजूत काढत आहेत. दोन दिवस नाराज इच्छुकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे प्रचार कार्यालयात येणे सावे आणि कराड यांनी टाळले होते. गुरुवारी (१ जानेवारी) ते कार्यालयात दिसले. त्यामुळे कार्यालय पुन्हा गजबजले.

अपक्ष खाताहेत ‘भाव’
भाजपकडून गुरुवारी सकाळपासून बंडखोरांची मनधरणी सुरू होती. पण दिवसभरात कुणीच प्रतिसाद दिला नाही. माघार घेण्यासाठी अपक्ष ‘भाव' खात आहेत. ते इतका भाव खात आहेत, की त्यांचा हा ‘भाव’ पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला मोठीच झळ पोहोचविणार आहे. आज दुपारी ३ पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. काही अपक्ष तर ‘यंदा लढायचेच, जिंकायचेच' ही भाषा कायम ठेवून आहेत. मतांचे विभाजन टाळण्यासाठी बंडखोरांना कितीही ‘भाव’ देऊन थोपविण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कॉपीमुक्त अभियान सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकारी स्वामी यांची स्‍पष्ट सूचना

Latest News

कॉपीमुक्त अभियान सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकारी स्वामी यांची स्‍पष्ट सूचना कॉपीमुक्त अभियान सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकारी स्वामी यांची स्‍पष्ट सूचना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कॉपीमुक्त अभियान राबविणे हे नितीमान नागरिक घडविण्याचे अभियान आहे. त्यामुळे हे अभियान यशस्वी करणे...
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...
असा आला, असा निघून गेला...CCTV मध्ये हा कोण दिसला?, वाळूज महानगरातील घटना
आत मतमोजणी, बाहेर अलोट गर्दी, मानली संधी अन्‌ चोरट्यांनी कमावले १० लाख!; गरवारे स्टेडियमवर सोन्याचे दागिने, रोकडवर मारला हात!!
तुझ्यामुळेच पराभूत झालो म्हणत भाजप उमेदवाराच्या घरावर टोळक्याचा सशस्‍त्र हल्ला!, क्रांती चौक भागातील गांधीनगरातील मध्यरात्रीचा थरार
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software