२८८ उमेदवार पाडायचे की उभे करायचे हे २० जुलैला ठरवू्‌; छत्रपती संभाजीनगरात मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा, महाशांतता रॅलीचा लाखो मराठा बांधवांच्या उपस्थितीत समारोप

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी/गणेश निंबाळकर : सीएससीएन वृत्तसेवा) : सरकारला दिलेली एक महिन्याची मुदत संपली आहे. आजच्या रात्रीत मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्या. मी पुन्हा २० जुलैपासून अंतरवाली सराटीत उपोषणाला बसणार असून, त्याच दिवशी हे २८८ उमेदवार पाडायचे की आपण उभे करायचे अथवा मुंबईला जायचे हे ठरवू, असा इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी शनिवारी […]

छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी/गणेश निंबाळकर : सीएससीएन वृत्तसेवा) : सरकारला दिलेली एक महिन्याची मुदत संपली आहे. आजच्या रात्रीत मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्या. मी पुन्हा २० जुलैपासून अंतरवाली सराटीत उपोषणाला बसणार असून, त्याच दिवशी हे २८८ उमेदवार पाडायचे की आपण उभे करायचे अथवा मुंबईला जायचे हे ठरवू, असा इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी शनिवारी (१३ जुलै) क्रांतीचौकात आयोजित महाशांतता रॅली व संवाद यात्रेच्या सांगता सभेत दिला.

जरांगे यांच्या रॅलीला ६ जुलैला हिंगोलीतून सुरुवात झाली होती. समारोप छत्रपती संभाजीनगरातील क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केला. या वेळी लाखो समाजबांधवांशी संवाद साधताना जरांगे यांनी पुढील आंदोलनाची घोषणा केली. सकाळी अकराला सिडकोतून रॅली सुरू होणार होती. मात्र रॅलीला बराच उशीर झाला. जरांगे यांचा ताफा दुपारी दीडला जालना रोडवरील केंब्रिज चौकात आला. तेथे मराठा बांधवांकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. तिथूनच रॅलीला सुरुवात झाली. सिडको चौकात येईपर्यंत विविध २२ ठिकाणी त्यांच्यावर चाहत्यांनी जेसीबी व भव्य क्रेनवरून पुष्पवृष्टी केली. दुपारी दीडला सुरू झालेली रॅली रात्री ८ वाजता तब्बल साडेसहा तासांनंतर क्रांतीचौकात आली. दिवसभरात अधूनमधून पावसाच्या सरी येत होत्या. जरांगे यांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा समाजबांधव होते.

कोपर्डीतील घटनेला १३ जुलै रोजी ८ वर्षे पूर्ण झाली. त्या घटनेत दगावलेल्या निर्भयास जरांगे यांनी श्रद्धांजली अर्पण करून जरांगे यांनी भाषणाला सुरुवात केली. क्रांती चौकात रॅलीचा समारोप करताना जरांगे म्हणाले, की ५७ लाख कुणबी नोंदी सरकारला सापडल्या. त्यांच्या कुटुंबांना धरून साधारण दीड कोटी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहेत. अर्धी लढाई आपण जिंकली आहे. सरकारला आवाहन करतो, की आमच्या नऊ मागण्यांची पूर्तता लवकर करावी. अन्यथा शांतता रॅलीचे अजून चार टप्पे बाकी आहेत. सगेसोयऱ्याचा कायदा करा, मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करा आणि अंतरवाली सराटीसह अन्य ठिकाणच्या मराठा आंदोलकांवरील गुन्हे रद्द करा या मागण्यांची पूर्तता करा, अशी मागणी त्‍यांनी सरकारकडे केली.

सकाळपासून कडेवर लेकरं घेऊन मायमाउली आणि समाजबांधव आले आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या मराठ्यांनी महाराष्ट्र जिंकला आहे. हा जनसमुदाय पाहा, आता सरकार पडेल का नाही, असा सवाल त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून केला. घाईगडबडीत आणि तुम्हाला विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही, मराठ्यांच्या हातून सत्ता जाऊ द्यायची नाही, असे ते म्हणाले. मंत्री छगन भुजबळ यांच्यावर एकेरी भाषेत टीका करत जरांगे म्हणले, की भुजबळ मला चौथी नापास, अक्कल नाही, असे म्हणतात. मी चौथी नापास आहे, शाळेत गेलोच नाही, पण मी ठोकलेला खुटा तुला उपटणे जमेना, म्हणून पडलेले ओबीसी नेते जमा केले. तुला घोटाळ्याचा, जेलमध्ये जाण्याचा धाक नाही; पण माझा धाक असल्याने तुला इंजेक्शन सुरू आहे, अशी टीका जरांगे यांनी केली. मराठा समाज कधीही जातीयवाद करीत नाही.

तुम्ही एकत्र आला तर जातीयवाद नाही; पण, मराठे एकवटले की, जातीयवादाचा डाग लावला जातो. तुम्हाला सत्ता दिली म्हणजे मराठ्यांवर अन्याय करणार का?, असा सवाल जरांगे यांनी करत गिरीश महाजन यांच्या मागे लागण्याचा इशारा समाजबांधवांना केला. महाजन यांच्या मतदारसंघात १ लाख ३६ हजार कुणबी मराठा बांधव आहेत. त्‍यांनी आता महाजनांच्या मागे लागा, असे ते म्‍हणाले. मराठा समाजाने मराठ्यांच्या मदतीला धावून जावे. मराठा अधिकारी, व्यावसायिक आणि नेत्यांनीही समाजाला साथ द्यावी. नेत्यांनीही त्यांच्या पक्षाला अथवा नेत्याला बाप मानू नये, तर समाजालाच बाप मानायचा सल्लाही त्यांनी दिला. मराठा आमदारांच्या मतावर विजयी झालेला आहात, हे विसरू नका. तुम्ही मराठ्यांचा विरोध करू नका, असे आवाहन जरांगे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या ११ आमदारांना केले. २० मिनिटांमध्ये भाषण आवरते घेणार असे सुरुवातीला जरांगे म्हणाले. मात्र मिळणारा प्रतिसाद पाहता भाषणाचा वेळ वाढवला. रॅली साडेसात तास चालली. तर १० तास जालना रोड बंद होता.

क्षणचित्रे…
-रॅलीत चारचाकी वाहनाच्या सनरुफमध्ये उभे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे समाजबांधवांना अभिवादन करत पुढे रवाना होत होते. त्यांच्या पाठीमागे ट्रॅक्टरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा होता.
-रॅलीसाठी सकाळी १० पासूनच समाजबांधव जालना रोडवर उभे होते. कोणी गटागटाने, कोणी एकटेच, तर कोणी कुटुंबीयांसह रॅलीत सहभागी झाले.
-बहुतांशजण पांढरे, केशरी रंगाचे कपडे परिधान करून आले होते.
-ठिकठिकाणी समाजबांधवांना अल्पोपाहार, फळ वाटप करण्यात आले.
-डीजेच्या तालावर रॅली पुढे जात होती. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्यांना जरांगे अभिवादन करीत होते. ठिकठिकाणी विविध संस्था, संघटना, समाजांतर्फे जरांगे यांचे जेसीबी आणि क्रेनच्या मदतीने भव्य पुष्पहाराने व फुलांची उधळण करून स्वागत करण्यात आले.
-पावसाने हजेरी लावल्यानंतरही रॅलीतील सहभागींचा उत्साह कायम होता. अनेक जण जरांगे यांचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करीत होते. रॅलीची सांगता ९.१५ वाजता झाली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना

Latest News

१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना १९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील पंढरपूर येथील कामगार चौकातील श्री जगदीश जयदीप इंडस्ट्रीज कंपनीत १९ वर्षीय तरुणाला...
चिकलठाण्याच्या हिनानगरमध्ये गोदामाला भीषण आग, मंडप डेकोरेशनचे लाखो रुपयांचे साहित्य खाक, आकाशात धुराचे लोट
कोलठाणच्या तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगरची दुर्दैवी घटना
लेक-सुनेला भेटायला गेल्या... उल्कानगरीत चोरट्यांनी घर साफ केले, पावणेदोन लाखांची चोरी !
धक्कादायक : एमजीएम हॉस्पिटलमधून रुग्णाच्या नातेवाइक महिलेची पर्स चोरीला गेली...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software