तनुश्री दत्ताने पुन्हा काढला राग! विवेक अग्निहोत्री अन्‌ नाना पाटेकरांवर टीकास्त्र, हे दोघे मुलगी बघितली नाही की...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

"आशिक बनाया आपने’ चित्रपटातील अभिनेत्री तनुश्री दत्ताने मी टू चळवळीदरम्यान ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तिने "चॉकलेट’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यासोबत काम करण्याचा अनुभवही वाईट असल्याचे म्हटले होते. आता, अलिकडच्याच एका मुलाखतीत, तिने पुन्हा दोघांवर शरसंधान साधले असून, संताप व्यक्त केला आहे.

मुलाखतीत तनुश्री दत्ताने "चॉकलेट’ चित्रपटातील एका दृश्याबद्दल सांगितले, जे तिने करण्यास नकार दिला होता. ती म्हणाली, की मला दृश्यासाठी ज्या पद्धतीचा पोशाख दिला होता, तो मला आपत्तीजनक वाटला होता. ही बाब मी विवेक अग्निहोत्रीला सांगितली तेव्हा तो आक्षेपार्ह शब्दांत माझ्याशी बोलला. मी त्याला सांगितले, की तू मिस इंडिया किंवा अशा कोणत्याही प्रोफेशनल व्यक्तीसोबत असे बोलू शकत नाहीस. त्याच्या बोलण्याचे मला आश्चर्य वाटले म्हणून मी आवाज उठवला. तनुश्री म्हणाली, की त्यावेळी त्याचे नावही घेतले नव्हते. तरीही तो अजूनही मुलाखत देऊन हवे ते माझ्याबद्दल बोलत असतो. त्यावेळी मी चित्रपटांमध्ये नवीन होती, मिस इंडिया पार्श्वभूमीतून आली होती जिथे नेहमीच कनिष्ठांशी चांगले बोलले जायचे. विवेक अग्निहोत्री तिला म्हणाले, की तुझे कपडे काढ आणि नाच. ज्यामुळे तनुश्री भडकली होती. याचा इतर सर्वांनाच धक्का बसला होता.

PHOTOS_Tanushree-Dutta006 (1)

तनुश्री दत्ता म्हणाली, मी संत नाही...
तनुश्री म्हणाली, की काही पुरुषांना महिलांशी कसे वागायचे हे माहीत नाही. मला कधीही प्रतिष्ठित व्यक्तींकडून कोणती समस्या आली नाही. मला असे लोक आवडतात जे प्रोफेशनल असतात आणि स्वतःच्या कामाकडे लक्ष देतात. काही लोक मुलगी बघितली नाही की लगेच वाहून जातात, मुलगी दिसली नाही की लगेच त्यांचा इगो जागरूक होतो. ते स्वतःला हिरो दाखवण्याचा प्रयत्न करतात. तिला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. मात्र प्रत्येकीला तुमच्याशी शारीरिकदृष्ट्या जवळीक साधायला आवडलेच असे नाही. मी म्हणत नाही की मी संत आहे. मला ज्याच्यासोबत आवडेल त्याच्या जवळ जाईल. तशी ती माझी इच्छा असेल. तुम्ही एक अभिनेता आहात. तुम्ही माझ्यासोबत अभिनय करत आहात, हे लक्षात ठेवायला हवे, असे तनुश्री म्हणाली.

नाना पाटेकर निरुपयोगी अभिनेता...
नाना पाटेकर यांच्याबद्दलही तनुश्रीने भाष्य केले. तिने डिंपल कपाडियाच्या त्या मुलाखतीचा उल्लेख केला, ज्यामध्ये तिने नानाला ‘बेहूदा’ म्हटले होते. डिंपल कपाडियासुद्धा त्याच्याबद्दल बोलली आहे, असे तनुश्री म्हणाली. बॉलीवूड अशी जागा आहे जिथे कोणीही विनाकारण लोकप्रिय होऊ शकते. २००८ मध्ये, जेव्हा मी माझ्या कारकिर्दीच्या शिखरावर होते, तेव्हा त्याचे कोणतेही चित्रपट नव्हते. माझी गाणी हिट झाली होती आणि मी सतत बातम्यांमध्ये असे, असे ती म्हणाली. त्याने माझ्यावर प्रसिद्धी स्टंट केल्याचा आरोप केला. मी आधीच खूप प्रसिद्ध होते. मला एका बेरोजगार, वयस्कर अभिनेत्याकडून प्रसिद्धीची गरज का होती?, असा सवाल तिने केला. बॉलिवूडमधील सर्व जुने लोक धूर्त आणि दुष्ट मनाचे आहेत. ते २० वर्षांपासून हा खेळ खेळत आहेत. तेव्हा मी निर्दोष होते. मला कल्पनाही नव्हती की लोक इतके धूर्त असू शकतात.

image-2024-03-19t173105.757-2024

अमिताभ बच्चन, शाहरुख खानचा उल्लेख
तनुश्री म्हणाली, की मला त्याच्यासारख्या (नाना) म्हाताऱ्या, बेरोजगार आणि कुरूप माणसाशी लोकांसमोर भांडण्याची गरज आहे का? जेव्हा मी इतकी लोकप्रिय होते. मिस इंडिया, मिस युनिव्हर्स, मिस इंडिया युनिव्हर्स.... आशिक बनाया आपने तेव्हाच माझा रिलिज झाला होता. मला आणखी पब्लिसिटीची काय गरज होती? अमिताभ बच्चन, शाहरुख सारखे स्वच्छ प्रतिमा असलेले मोठे अभिनेते आहेत. त्यांच्याशी वाद केला असता ना, अजून पण बरेच मोठे अभिनेते होते वाद घालायला जरा मला प्रसिद्धीच हवी होती. २००८ मध्ये सर्व दिग्‍ददर्शक त्याच्यासोबत काम करायला घाबरत होते, त्याला काम मिळत नव्हते. त्याची अशी अवस्था असताना त्याच्यासोबत मी प्रसिद्धीसाठी वाद करावा का?, असा सवाल तनुश्रीने केला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना

Latest News

१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना १९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील पंढरपूर येथील कामगार चौकातील श्री जगदीश जयदीप इंडस्ट्रीज कंपनीत १९ वर्षीय तरुणाला...
चिकलठाण्याच्या हिनानगरमध्ये गोदामाला भीषण आग, मंडप डेकोरेशनचे लाखो रुपयांचे साहित्य खाक, आकाशात धुराचे लोट
कोलठाणच्या तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगरची दुर्दैवी घटना
लेक-सुनेला भेटायला गेल्या... उल्कानगरीत चोरट्यांनी घर साफ केले, पावणेदोन लाखांची चोरी !
धक्कादायक : एमजीएम हॉस्पिटलमधून रुग्णाच्या नातेवाइक महिलेची पर्स चोरीला गेली...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software