सुनील शेट्टी विशेष मुलाखत : अपयशाला मनावर घेतले नाही अन्‌ यशाला माझ्या डोक्यात जाऊ दिले नाही…., लोक म्हणायचे, याने चित्रपट सोडून इडली-वडा विकावा…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

अण्णा म्हणून ओळखले जाणाऱ्या सुनील शेट्टी यांनी बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये ३३ वर्षे घालवली आहेत. ते त्यांच्या भूमिका, फिटनेस आणि स्पष्टवक्तेपणामुळे सतत चर्चेत राहतात. आता ते नवीन चित्रपट “केसरी वीर’मुळे चर्चेत आहे. अलीकडेच, दिलेल्या विशेष मुलाखतीत चित्रपट, बॉक्स ऑफिस, त्यांचा संघर्ष, जावई केएल राहुल आणि नात इवारा यांच्यासह इतर अनेक मुद्द्यांवर त्यांनी मनमोकळी चर्चा केली. सुनील शेट्टी […]

अण्णा म्हणून ओळखले जाणाऱ्या सुनील शेट्टी यांनी बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये ३३ वर्षे घालवली आहेत. ते त्यांच्या भूमिका, फिटनेस आणि स्पष्टवक्तेपणामुळे सतत चर्चेत राहतात. आता ते नवीन चित्रपट “केसरी वीर’मुळे चर्चेत आहे. अलीकडेच, दिलेल्या विशेष मुलाखतीत चित्रपट, बॉक्स ऑफिस, त्यांचा संघर्ष, जावई केएल राहुल आणि नात इवारा यांच्यासह इतर अनेक मुद्द्यांवर त्यांनी मनमोकळी चर्चा केली. सुनील शेट्टी यांनी १९९२ मध्ये ‘बलवान’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. तीन दशकांच्या कारकिर्दीत विनोदी ते रोमँटिक, गंभीर आणि नकारात्मक अशा भूमिका त्यांनी साकारल्या. प्रत्येक भूमिकेत खोलवर छाप सोडली. “केसरी वीर’मध्येही त्यांची मजबूत भूमिका आहे.

प्रश्न : तुम्ही या इंडस्ट्रीत ३३ वर्षांहून अधिक काळ आहात, पण तरीही शुक्रवार तुम्हाला घाबरवतो का? सध्याच्या परिस्थितीत मोठे स्टार बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकत नाहीत, तुम्हाला काळजी वाटते का?
सुनील शेट्टी :
आज मी यश आणि अपयशाच्या पलीकडे असलो तरी शुक्रवार अजूनही मला घाबरवतो आणि कारण मला माझ्या उद्योगाची काळजी वाटते. जर चित्रपट यशस्वी झाले तर आपला उद्योग यशस्वी होईल. आपल्या इंडस्ट्रीला चांगले विषय आणि चांगल्या कथांची गरज आहे. प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करू शकतील असे विषय असावेत. चित्रपट चालत नाहीत असे नाही. चांगले चित्रपट, मग ते बंगाली, तमिळ, मल्याळम किंवा कन्नड असोत, चालू आहेत. सध्या चांगल्या हेतूने बनवलेल्या चांगल्या चित्रपटाची गरज आहे.

प्रश्न : तुमच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, तुम्ही त्या कलाकारांच्या पिढीतील आहात ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीत खूप संघर्ष केला. तुम्ही हॉटेलमध्ये काम करत असतानाचा काळ कसा होता?
सुनील शेट्टी :
जर मी स्वतःबद्दल बोललो तर, मी भाग्यवान होतो की मला माझ्या वडिलांच्या संघर्षाबद्दल माहिती होती आणि मी अभिमानाने म्हणायचो की वयाच्या ९ व्या वर्षी माझे वडील हॉटेलमध्ये काम करायचे आणि टेबल साफ करायचे. मला नेहमीच त्यांचा अभिमान होता आणि तो अभिमान मी कायम ठेवला आहे. मी स्वतः माझ्या वडिलांसोबत रेस्टॉरंटमध्ये काम करायला सुरुवात केली होती. माझ्या वडिलांनी मला हेच शिकवले, अतिथि देवो भव. खाल्ल्यानंतर किंवा पिल्यानंतर एखाद्या ग्राहकाने मला शिवीगाळ केली तरी मला त्याचा आदर करायला शिकवले गेले. मी त्याला त्याच्या गाडीपर्यंत सोडायचो. आमचा उदरनिर्वाह त्यांच्यावर अवलंबून होता. नम्रता माझ्यात नेहमीच होती. आजही, सेटवर माझी खुर्ची कोणाला दिली तरी मला काही फरक पडत नाही. मला अनेक नकारांचा सामना करावा लागला आहे. पण माझे संगोपन इतके मजबूत आहे की मी सहजासहजी तुटत नाही.

प्रश्न : तुमचा पहिला चित्रपट “बलवान’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता…
सुनील शेट्टी
: हो, माझा पहिला चित्रपट बलवान सुपरहिट झाला हे खरे आहे, पण एका खूप मोठ्या समीक्षकाने माझ्याबद्दल म्हटले होते की त्याने चित्रपट सोडून रेस्टॉरंट चालवावे. त्याला इथे काम नाही. त्याने रेस्टॉरंटमध्ये जाऊन इडली-वडा विकावा. त्या टीकाकाराला वाटले की तो असे बोलून माझा अपमान करत आहे. पण माझ्यासाठी हॉटेल चालवणे हा माझा व्यवसाय होता. ते माझे घर चालवणारे होते. माझ्या बहिणी मोठ्या झाल्या, त्याच रेस्टॉरंटमुळे त्यांचे शिक्षण झाले. म्हणून मी असे म्हणतो की माझ्यासाठी रेस्टॉरंटमध्ये काम करणे कधीही लज्जेचे कारण नव्हते. यश अनेक गोष्टी बदलते, परंतु तुम्ही तुमची मुळे विसरू नये. माझ्या वडिलांच्या संघर्षाच्या तुलनेत माझा संघर्ष काहीच नव्हता. मी भाग्यवान आहे की मला इथे संधी मिळाली आणि मी आजही इथे आहे. मी कधीही अपयशाला मनावर घेतले नाही आणि यशाला माझ्या डोक्यात जाऊ दिले नाही.

प्रश्न : एकेकाळी, तुमचे क्रिकेटर होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. पण शेवटी तुम्हाला एक क्रिकेटर जावई (क्रिकेटर केएल राहुल) मिळाला…
सुनील शेट्टी :
(हसत) तुम्ही जी काही इच्छा मनात बाळगाल, ती नक्कीच प्रत्यक्षात येईल. मी माझ्या आयुष्यात हे अनुभवले आहे. हे सर्वांना लागू होते, पण याचा अर्थ असा नाही की एखादी इच्छा किंवा ध्येय प्रकट केल्यानंतर, तुम्ही झोपावे, त्यासाठी कोणतेही प्रयत्न करू नये. तुम्हाला त्यादृष्टीने मेहनत करावी लागेल, प्रयत्न करावे लागणारच आहेत. आजच्या काळात, एआय देखील माझ्यासाठी आयते काहीच करू शकत नाही, कारण मला त्याला आज्ञा द्यावीच लागते. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतात. केएल राहुल आमच्या कुटुंबाचा सदस्य आहे याचा मला आनंद आहे. खरंच, तोच माझा क्रिकेटर होण्याचे स्वप्न पूर्ण करत आहे.

प्रश्न : अलिकडेच तुम्ही आजोबा झालात. अथिया आणि केएल राहुल यांनी मुलीचे एक अतिशय वेगळे नाव (इवारा) ठेवले आहे, आजोबा होण्याचा तुम्हाला किती आनंद होत आहे?
सुनील शेट्टी :
माझी नात इवारा ही अथियाची संपूर्ण प्रत आहे. तुम्ही तिला अथिया 2.O असेही म्हणू शकता. तुम्ही समजू शकता की मुद्दलापेक्षा व्याज जास्त प्रिय आहे. इवारा म्हणजे देवाकडून मिळालेली देणगी. अथियाचा अर्थही तोच आहे. ती बहुतेकदा आमच्यासोबतच राहते. इमारतीतील सर्व मुले संध्याकाळी ६ नंतर आमच्यासोबत राहतात. संध्याकाळ होताच ते घरी येतात आणि विचारू लागतात, आजोबा आले आहेत का, आजी आली आहेत का?

प्रश्न : तुमच्या नवीन चित्रपट केसरी वीर बद्दल बोलायचे झाले तर, तुम्ही एक ऐतिहासिक भूमिका साकारणार आहात का?
सुनील शेट्टी :
मला ही भूमिका खूप शक्तिशाली वाटली. अशा प्रकारची व्यक्तिरेखा पडद्यावर क्वचितच पाहायला मिळते. ते पात्र खूप मजबूत वाटत होते. हा चित्रपट आपल्याला आपण कोण आहोत हे शिकवतो आणि मला ही संकल्पना खूप आवडली. चित्रपटाचे दिग्दर्शक प्रिन्स धीमान यांनी विषयाला सर्व प्रकारे न्याय दिला आहे. या भूमिकेसाठी मी शारीरिक प्रशिक्षणही घेतले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना

Latest News

चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' अचानक तुटून अंगावर पडल्याने ५५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना...
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
वेळीच एअरबॅग उघडल्याने वाचले मुख्याध्यापक देविदास चितळे, नियंत्रण सुटून कार २० फूट खोल चारीत कोसळली!, फुलंब्रीजवळील दुर्घटना
सिडको बसस्थानकावर नाश्ता सेंटरचालकावर चौघांचा हल्ला, जुन्या भांडणावरून रिक्षाचालकाची खुन्नस, दोघे जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software