अतिवृष्टीचे आणखी २ बळी!; सोयगाव, कन्नड तालुक्यात शेतकऱ्यांनी कवटाळले मरण

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सोयगाव/कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे वाढलेला कर्जबाजारीपणा आणि रब्बीच्या पेरणीचीही निर्माण झालेली चिंता यामुळे नैराश्यात जाऊन आतापर्यंत २० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्‍महत्‍या केल्या आहेत. त्यात आणखी २ शेतकऱ्यांची भर पडली असून, सोयगाव व कन्नड तालुक्यात बुधवारी (१२ नोव्हेंबर) या घटना घडल्या. अविनाश ऊर्फ पंकज दादाभाऊ भदाणे (वय ४०, रा.शिंदोळ (ता. सोयगाव) आणि अनिल मांगू पाटील (वय ३६, रा. नागद, ता. कन्नड) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

अविनाश भदाणे यांच्या आईच्या नावे शिदोळ शिवारात पाच एकर शेती असून, त्यांनी कपाशी व मकाची लागवड केली होती. मात्र अतिवृष्टीने दोन्ही पिके वाया गेली. सोसायटीचे १ लाख २५ हजार रुपये व इतर ४ लाख रुपयांचे कर्ज कसे फेडावे, या चिंतेत ते काही दिवसांपासून होते. बुधवारी सकाळी ते शेतात गेले. बराच वेळ होऊनही घरी आले नाहीत म्हणून त्यांची पत्नी शेतावर गेली असता शेडमध्ये अविनाश गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. त्यांनी हंबरडा फोडला. त्यांचा आक्रोश ऐकून शेतकऱ्यांनी धाव घेतली. शेतकऱ्यांनी अविनाश यांना भडगाव (जि. जळगाव) येथील सरकारी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

दुसऱ्या घटनेत नागद येथील अनिल पाटील यांनी त्यांच्याकडील ६ एकर शेतीत केळी व मकाची लागवड केली. मात्र अतिवृष्टीमुळे दोन्ही पिकांचे नुकसान झाले. त्यातच केळीचे भाव पडल्याने खर्च निघणेही कठीण झाले. पिकांसाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे, अशी चिंता त्यांना लागली होती. त्यामुळे काही दिवसांपासून नैराश्यात गेले. बुधवारी पहाटे सव्वा पाचला राहत्या घरी गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

तळहातावरची लग्नरेषा सांगते, लव्ह मॅरेज असेल की ॲरेंज, जोडीदार कसा असेल, लग्न किती होणार?

Latest News

तळहातावरची लग्नरेषा सांगते, लव्ह मॅरेज असेल की ॲरेंज, जोडीदार कसा असेल, लग्न किती होणार? तळहातावरची लग्नरेषा सांगते, लव्ह मॅरेज असेल की ॲरेंज, जोडीदार कसा असेल, लग्न किती होणार?
जगातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनसाथीबद्दल जाणून घ्यायचे असते. प्रत्येकाला त्याचे लग्न लव्ह मॅरेज असेल की अरेंज मॅरेज असेल हे जाणून...
आर. माधवनची विशेष मुलाखत : ‘धुरंधर' गेम चेंजर ठरेल आधीच कल्पना होती, देशापेक्षा वर काहीही नाही...
आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश
भरधाव पिकअप वाहनाने स्कुटीला उडवले, मायलेकी जखमी, छत्रपती संभाजीनगर शहराजवळील घटना
सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software