महत्त्वाची बातमी : पैठण येथील श्रीमहानुभाव दत्त मंदिर विकास आराखड्यास उच्चाधिकार समितीची मान्यता

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पैठण येथील ऐतिहासिक व महानुभाव पंथाचे महत्त्वाचे तीर्थस्थळ असलेल्या श्रीमहानुभाव दत्त मंदिराच्या विकास आराखड्याचे आज, २८ एप्रिलला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकारी समितीसमोर सादरीकरण झाले. या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या २५ कोटी रुपयांच्या आराखड्यात काही बदल सूचवत या आराखड्यास मान्यता देण्यात आली व सुधारित आराखडा सादर करण्याचे आदेश देण्यात आले. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पैठण येथील ऐतिहासिक व महानुभाव पंथाचे महत्त्वाचे तीर्थस्थळ असलेल्या श्रीमहानुभाव दत्त मंदिराच्या विकास आराखड्याचे आज, २८ एप्रिलला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकारी समितीसमोर सादरीकरण झाले. या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या २५ कोटी रुपयांच्या आराखड्यात काही बदल सूचवत या आराखड्यास मान्यता देण्यात आली व सुधारित आराखडा सादर करण्याचे आदेश देण्यात आले.

दूरदृष्य प्रणालीद्वारे हे सादरीकरण झाले. राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, पैठण नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शेवलीकर आदी जिल्हा मुख्यालयातून उपस्थित होते. श्रीमहानुभाव दत्त मंदिर ट्रस्ट हे महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्रीचक्रधर स्वामी यांच्याशी संबंधित आहे. ११८९ च्या सुमारास चक्रधर स्वामी या भागात वास्तव्यास होते. श्री स्वामी त्र्यंबकेश्वर ते राहेर या समग्र गोदावरी काठी विहार करीत. येथेच त्यांनी आपल्या अनुयायांना उपदेश केले. त्यामुळे हे स्थळ महानुभाव पंथियांसाठी महत्त्वाचे आहे. या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी २५ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला. त्यात भक्तनिवास, सभागृह, ग्रंथालय, स्वच्छता गृह, वाहनतळ व परिसर सुशोभिकरण आदी कामे करण्यात येणार आहेत. या आराखड्यात मुख्यसचिव श्रीमती सौनिक यांनी व समिती सदस्यांनी काही फेरबदल सुचविले. पर्यावरणपूरक रचना व सौर उर्जेचा अधिकाधिक वापर, तसेच वृक्ष लागवड, पदपथ आदी दुरुस्त्या सुचविल्या. त्यानुसार आराखडा सुधारित करून पुन्हा सादर केला जाईल. या संदर्भात १० मेनंतर पुढील बैठकीत अंतिम निर्णय होईल, असे सांगण्यात आले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!

Latest News

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ! State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!
बीड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कला केंद्रातील मुलीला अंबाजोगाई येथील साई लॉजवर नेऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली...
State Political News : मीरा-भाईंदरमध्ये महायुतीबाबत सस्पेन्स कायम!, भाजपची ‘७० पार’ची घोषणा अन्‌ शिंदे गटाचा फिफ्टी- फिफ्टी फार्मूला!!
कमावत्या पत्नीला पोटगीचा अधिकार नाही; मुंबई उच्च न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळली
विभागीय आयुक्‍त कार्यालयासमोर सरपंचपती, ग्रा. पं. अधिकाऱ्याचा राडा!; दोन गटांत हाणामारी, छत्रपती संभाजीनगरची घटना, प्रकरण लातूरचे, सुनावणीसाठी होते छ. संभाजीनगरला...
मिल कॉर्नर हिट ॲन्ड रन; क्रांती चौक पोलिसांनी केला ‘या’ कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software