राजनगरमध्ये मध्यरात्री हल्लकल्लोळ! टवाळखोराने जाळल्या ५ दुचाकी!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनजवळील राजनगरमध्ये टवाळखोरांनी ५ दुचाकी वाहने पेटवून दिल्याची घटना शनिवारी (६ डिसेंबर) पहाटे समोर आली. आगीत दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे रहिवाशी घाबरून गेले आहेत.

राजेंद्र लादूलालजी शर्मा (वय ४३, रा. राजनगर) यांच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिसांनी अज्ञात टवाळखोराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शर्मा स्वयंपाकाचे काम करतात. घराकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने ते व अन्य रहिवासी त्यांच्या दुचाकी नव्याने झालेल्या शिवाजीनगर-रामनगर या सिमेंट रोडवर जांभळाच्या झाडाजवळील मोकळ्या जागेवर उभी करतात. शुक्रवारी त्यांनी वाहने तिथेच उभी केली होती. मध्यरात्री १ ला ड्युटीवरून परतणाऱ्या नागरिकांना गाड्यांना आग लागल्याचे दिसले.

त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर आग विझविण्यासाठी एकच पळापळ सुरू झाली. शर्मा यांच्यासह भानुदास विश्वनाथ मोरे, संतोष प्रभाकर प्रभातराव, उद्धव सीताराम वाघ, कृष्णा रमेश सूर्यवंशी यांच्या दुचाकी टवाळखोराने जाळल्या. आता या पाचही जणांना कामधंद्यावर जाण्याची पंचाईत झाली आहे. या भागात रात्री, दिवसा सर्रास नशेखोरांचा वावर असतो. ते लूटमार, हाणामाऱ्या, खंडणी वसुली करून दहशत निर्माण करतात. पोलीस त्यांच्यावर अंकुश लावण्यात अपयशी ठरल्याची नागरिकांची भावना आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

राजेंद्र जंजाळ-मंत्री शिरसाटांतील तणाव शिगेला!

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software