दानपेटीत चुकून वस्तू पडल्यास विसरा; परत मिळणार नसल्याचा तुळजाभवानी संस्थानचा अजब फतवा!; भाविकांत संताप

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

तुळजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या तुळजापुरातील तुळजाभवानीच्या दर्शनाला गेलात आणि जाणार पण करताना दानपेटीत चुकून आपली काही वस्तू पडली तर ती दान म्हणून सोडून द्यावी लागणार आहे. कारण तुळजाभवानी मंदिर संस्थानने तसा फतवाच जारी केला आहे. संस्थानाने जुन्या ठरावाचा आधार घेत काढलेल्या या प्रमाणाचा एका भाविकाला फटका बसला असून, संस्थानच्या या निर्णयामुळे तुळजाभवानीच्या भक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

पिंपरी चिंचवडचे सुरज टिंगरे असे तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या निर्णयाचा फटका बसलेले भक्त ठरले आहेत. दोन महिन्यांपूर्वी टिंगरे हे तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापुरात गेले होते. देवीची मनोभावे पूजा व प्रार्थना केल्यानंतर त्यांनी तेथे ठेवलेल्या दक्षिणा पेटीत दान टाकले. पण यावेळी चुकून त्यांच्या बोटातील जवळपास एक तोळा वजन असलेली सोन्याची अंगठीही दानपेटीत पडली. विभाग लक्षात येतात त्यांनी तातडीने मंदिर प्रशासनाकडे धाव घेतली. अंगठी परत मिळावी यासाठी टिंगरे यांनी प्रशासनाकडे रीतसर अर्जही दाखल केला. मात्र दानपेटीत चुकून पडलेली वस्तू दानच समजली जाईल ती परत देता येणार नाही, असे स्पष्ट करीत प्रशासन समितीने टिंगरे यांचा अर्ज फेटाळून लावला. त्यांना आणखी परत करण्यासही नकार देण्यात आला. यामुळे सुरज टिंगरे यांच्यावर डोक्याला हात लावण्याची पाळी आली असून, मंदिर प्रशासनाच्या या निर्णयावर अन्य भक्त मंडळीही संतापली आहेत.

2017 च्या ठरावाचा दाखला
सुरज टिंगरे यांचा अर्ज वेटाळून लावताना तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने 31 ऑगस्ट 2017 रोजी संमत केलेल्या ठरावाचा दाखला दिला आहे. देवीच्या दानपेटीत भक्तांनी नजर चुकीने टाकलेल्या किंवा त्यांच्याकडून पडलेल्या मौल्यवान वस्तू दान समजल्या जातील आणि त्या भक्तांना परत केल्या जाणार नाहीत, अशा स्वरूपाचा हा ठराव त्यावेळी पारित करण्यात आला होता. करतात दानपेटीत भाविकांचा मोबाईल पडल्यास मात्र संबंधित भाविकाच्या विनंतीनंतर ओळख पटवून तहसीलदार व प्रशासन व्यवस्थापक यांच्या परवानगीने तो त्याला परत केला जाईल, असेही या ठरावात म्हटलेले आहे. आता सुरज टिंगरे यांच्या अर्जाला उत्तर देताना मंदिर संस्थानने याच ठरावाचा दाखला दिला आहे. पण या निर्णयामुळे भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा मंदिर संस्थान घेत असल्याचा आरोप होत असून पुजारी मंडळासह अनेक भक्तांनी हा ठराव मागे घेण्याची मागणी केली आहे. यावर मंदिर संस्थान कोणता निर्णय घेते याकडे तुळजाभवानीच्या राज्यभरातील भक्तांचे लक्ष लागले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना

Latest News

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उधारीत लस्सी न दिल्याने ३ टवाळखोरांनी तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुण जखमी झाला....
हिंदू मुलींना फसवण्यासाठी विशिष्ट समुदायाकडून पैसे दिले जातात!; छत्रपती संभाजीनगरमध्ये जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे स्पष्ट मत 
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध डॉक्टरकडून खंडणी स्वीकारताना तिघे अटकेत!; खऱ्या नोटांऐवजी पोलिसांनी दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा... हडको एन १२ मध्ये सिटी चौक पोलिसांच्या कारवाईने खळबळ 
Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...
इंडक्शन कुकर किंवा सिलिंडर मिळत नसेल, तर कमी किमतीत तुमचे जेवण शिजवण्यासाठी वापरा हे गॅझेट्स...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software