बायजीपुऱ्यात इम्‍तियाज जलील यांच्यावर हल्ला, आधी धक्काबुक्कीचा प्रयत्न, नंतर गाडीवर हल्ला, १ कार्यकर्ता जखमी, पोलिसांचा लाठीमार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ‘एमआयएम’चे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रचार रॅलीवर आज, ७ जानेवारीला दुपारी दोनच्या सुमारास बायजीपुऱ्यात हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. जलील हे त्यांच्या कारमध्ये होते. या हल्ल्यात जलील यांचे समर्थक आणि विरोधक कार्यकर्त्यांत धुमश्चक्री झाली. त्यात एक कार्यकर्ता जखमी झाला आहे. पोलिसांनी वेळीच परिस्थिती हाताळून बळाचा वापर केल्याने हल्लेखोर पळून गेले. दरम्‍यान, या घटनेनंतर जलील यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.

प्रत्‍यक्षदर्शी सूत्रांच्या माहितीनुसार, जलील यांची प्रचार रॅली बायजीपुऱ्यातून जात होती. काही तरुणांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. यावेळी जलील यांना धक्काबुक्कीही करण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण राखले. त्यानंतर रॅली पुढे गेली. रॅली संपल्यानंतर जलील कारमध्ये बसताच काही आक्रमक तरुणांनी अचानक गाडीवर हल्ला चढवला. समर्थक आणि विरोधक कार्यकर्ते समोरासमोर आल्याने पोलिसांनी लाठीमार करून जमाव पांगवला. हा हल्ला काँग्रेस उमेदवार कलीम कुरेशी यांनी केल्याचा आरोप जलील यांनी केला आहे.

हल्ल्याचा अंदाज होता. पोलिसांना माहिती देऊनही त्यांनी योग्य बंदोबस्त ठेवला नाही, असा दावा जलील यांनी समर्थकांनी केला. दरम्यान, कलीम कुरेशी यांनी जलील यांचा आरोप फेटाळून लावला. जलील यांनी पैसे घेऊन तिकीट विकल्यामुळे कार्यकर्ते नाराज असून, हा हल्ला त्यांनी आपल्याच कार्यकर्त्यांकरवी करवून घेत सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. या हल्ल्याशी आमचा कोणताही संबंध नाही, असे स्पष्टीकरण कुरेशी यांनी दिले आहे. घटनेमुळे बायजीपुऱ्यात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मंत्री शिरसाट, डॉ. कराड म्हणाले..
ब्लॅकमेलिंग करण्यात जलील माहीर आहेत. पैसे घेऊन तिकीट विकल्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी जलील यांना धडा शिकवला. शेर आया शेर आया असा म्हणणारा शेपूट घालून पळताना पाहिला. जलील यांनी केलेले पापच त्यांना भोगावे लागणार आहेत. आम्हाला गुंड पाठविण्याचची गरज नाही. ही तुम्हीच केलेली पापाची फळे आहेत, अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. डॉ. भागवत कराड म्हणाले, की निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलल्यामुळे त्यांनीच हा प्रकार केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही...

Latest News

खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही... खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही...
खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : खुलताबाद पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्‍या गटाने चक्‍क भाजपला साथ दिली. ही...
बायको दारू पिण्यासाठी पैसे देत नाही म्हणून नवऱ्याने घर दिले पेटवून!, सिल्लोडची घटना
पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात सहायक फौजदाराने पीडितेच्या पतीला कानशिलात वाजवल्याचा आरोप, जोरात फटका बसल्याने जमिनीवर कोसळला... व्हायरल व्हिडीओचे सत्य काय..?
मित्राच्या घरात आढळला युवकाचा संशयास्पदस्थितीत मृतदेह, बिडकीनजवळील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांना उद्योगमंत्र्यांनी केले आश्वस्त, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार वापरण्याची केली सूचना, उद्योजकांशी बोलताना काय म्हणाले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software