पैठण हादरले : मस्तवाल अधिकाऱ्यांनी घेतला शेतकऱ्याचा बळी!; रस्‍तेकामामुळे शेतात पाणी साचत असल्याचे सांगत असलेल्या शेतकऱ्याला धारेवर धरले, उद्विग्न शेतकऱ्याने जवळच्या विहिरीत उडी घेतली!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : पैठण तालुक्यातील खादगाव येथे अधिकाऱ्यांच्या मस्तवालपणामुळे एका शेतकऱ्याचा बळी गेला आहे. खादगाव ते खर्डा रस्ताकामामुळे शेतात पाणी साचल्याची तक्रार शेतकऱ्याने महसूल विभागाकडे केली होती. मंडळ अधिकारी आणि तलाठी पाहणीसाठी आले असता त्यांनी दिलासा देण्याऐवजी शेतकऱ्यालाच मस्तवालपणे बोलायला सुरुवात  केली. त्‍यामुळे उद्विग्न झालेल्या शेतकऱ्याने त्यांच्यासमोरच थेट विहिरीत उडी घेऊन जलसमाधी घेतली. ही धक्कादायक घटना मंगळवारी (१६ सप्टेंबर) दुपारी अडीचला घडली. संजय शेषराव कोहकडे (वय ४५, रा. खादगाव) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

पावसामुळे रस्त्याचे काम बंद झाले. रस्त्यालगत संजय कोहकडे यांचे शेत आहे. शेताच्या दोन्ही बाजूंनी खोदकाम झालेले असल्याने पावसाचे पाणी कोहकडे यांच्या शेतात साचून पिकांचे नुकसान झाले. कोहकडे यांनी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली. मंगळवारी दुपारी नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी बालानगर मंडळ अधिकारी शुभांगी शिंदे आणि तलाठी लक्ष्मीकांत गोजरे घटनास्थळी आले. कोहकडे हे त्यांच्यासमोर व्यथा मांडत असताना दोन्ही अधिकाऱ्यांनी त्यांना सुनावत अपमानास्पद बोलायला सुरुवात केली. आधीच झालेले नुकसान, त्‍यात दिलासा देण्याऐवजी हे दोन्ही अधिकारी मस्तवालपणे बोलून अपमानित करत असल्याने शेतकरी कोहकडे हे उद्विग्न झाले. त्यांनी अधिकाऱ्यांसमोरच पळत जाऊन शेजारील विहिरीत उडी घेतली. त्‍यामुळे एकच गोंधळ उडाला. ग्रामस्थांनीही त्यांना वाचविण्यासाठी विहिरीत उड्या टाकल्या.

कोहकडे यांना विहिरीबाहेर काढून पाचोड शासकीय ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र डॉ. प्रकाश साबळे यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. कोहकडे यांच्याकडे पाच-सहा एकर शेती आहे. घरची परिस्थिती जेमतेम आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, एक मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे ग्रामस्थ आणि अधिकारीही हादरून गेले. संतप्त नातेवाइकांनी दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली. पाचोड पोलिसांनी त्यांची समजूत काढून कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर सायंकाळी ७ ला मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली. पाचोड पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

दोन्ही अधिकारी वादग्रस्त
दरम्‍यान, बालानगर मंडळ अधिकारी शुभांगी शिंदे आणि तलाठी लक्ष्मीकांत गोजरे हे दोन्ही अधिकारी वादग्रस्त असून, शेतकऱ्यांची कामे रखडवणे, वारंवार चकरा मारायला लावणे, असभ्य शब्‍दांत बोलणे यामुळे शेतकरी, ग्रामस्थांत त्‍यांच्याबद्दल रोष आहे. आताच्या घटनेने त्‍यांच्या कृत्‍याने कळस केल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्‍त केली आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली जात आहे. दरम्‍यान, या घटनेबाबत मंडळ अधिकारी शुभांगी शिंदे म्हणाल्या, की तहसील कार्यालयाच्या आदेशावरून मी स्वतः खादगावला गेले होते. तेथे शेतकऱ्यांशी चर्चा करत होते. अचानक संजय कोहकडे यांनी जवळच असलेल्या विहिरीत उडी घेतली. घटनेची माहिती मी स्वतः पैठणच्या तहसीलदार ज्योती पवार व पाचोड पोलिसांना दिली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश

Latest News

आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार पुन्हा गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या जाहीर...
भरधाव पिकअप वाहनाने स्कुटीला उडवले, मायलेकी जखमी, छत्रपती संभाजीनगर शहराजवळील घटना
सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
शिंदे गटाला सोबत घ्यावेच लागणार, पण ‘अटींचा’ भडीमार नको म्हणून भाजपच्या खेळ्या सुरू..., शहर-जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे काय म्हणाले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software