सकल हिंदू समाज जागा हो, अन्यथा देशात बांगलादेशासारखी परिस्थिती; हिंदुत्‍ववादी नेते सुरेश चव्हाणके सिल्लोडमध्ये कडाडले, भव्य जनआक्रोश मोर्चाने शहर दणाणले..!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : बांगलादेशाच्या निर्मितीत हिंदूंनी बलिदान दिलेले आहे. मात्र आज हिंदूंवर त्या ठिकाणी अत्याचार होत आहेत. सकल हिंदू समाज वेळीच जागा झाला नाही तर देशात बांगलादेशासारखी परिस्थिती उद्‌भवायला वेळ लागणार नाही, असा इशारा हिंदुत्‍ववादी नेते सुरेश चव्हाणके यांनी सिल्लोडमध्ये दिला. देशात पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान येथील १० कोटी घुसखोर असून महाराष्ट्रात ८० लाख आहेत. […]

सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : बांगलादेशाच्या निर्मितीत हिंदूंनी बलिदान दिलेले आहे. मात्र आज हिंदूंवर त्या ठिकाणी अत्याचार होत आहेत. सकल हिंदू समाज वेळीच जागा झाला नाही तर देशात बांगलादेशासारखी परिस्थिती उद्‌भवायला वेळ लागणार नाही, असा इशारा हिंदुत्‍ववादी नेते सुरेश चव्हाणके यांनी सिल्लोडमध्ये दिला. देशात पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान येथील १० कोटी घुसखोर असून महाराष्ट्रात ८० लाख आहेत. त्‍यांना वेळीच बाहेर काढणे गरजेचे आहे, असे चव्हाणके म्हणाले.

सिल्लोडमध्ये सकल हिंदू समाजातर्फे बुधवारी (१४ ऑगस्ट) बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. डॉ. आंबेडकर चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. भगवान महावीर चौकात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. मोर्चेकरांनी जोरदार घोषणा दिल्या. हातात भगवे झेंडे, डोक्यावरील भगव्या टोप्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. शहर बंदची हाक देण्यात आल्याने व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत सकाळपासूनच दुकाने बंद ठेवली होती. केवळ सिल्लोड शहरच नव्हे तर अंधारी, भराडी, पळशी, उंडणगाव, गोळेगाव, पानवडोद, भवन येथील व्यवहारही ठप्प होते.

ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक मोर्चात सहभागी होण्यासाठी आले होते. सभेत व्यासपीठावर स्वामी सर्वानंद सरस्वती महाराज, स्वाध्वी गायत्री देवी, हभप मनोज महाराज भाग्यवंत, मिरगे महाराज, रवींद्र राजहंस महाराज, हिंदूराष्ट्र अभियानाचे कार्यवाहक कमलेश कटारिया यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थितांना हिंदू एकजूटतेची शपथ देण्यात आली. मोर्चात माजी आमदार सांडू पा. लोखंडे, भाजपचे प्रदेश चिटणीस सुरेश बनकर, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मोठे, तालुकाध्यक्ष अशोक गरुड, जिल्हा उपाध्यक्ष सुनील मिरकर, माजी सभापती ज्ञानेश्वर तायडे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विजय वानखेडे, मनोज मोरेल्लू, विष्णू काटकर, रघुनाथ घरमोडे यांच्यासह हजारोंच्या संख्येने हिंदू बांधव सहभागी झाले होते.

नंतर तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. देशात वक्फ बोर्डाने हजारो एकर जमिनीवर कब्जा केलेला असून वक्फ बोर्ड बरखास्त करण्यात यावे. राज्यातील गड, किल्ल्यांवरील अतिक्रमणे शासनाने काढावे, हिंदूंना देशात बिनशर्त प्रवेश द्यावा. लव्ह जिहाद, गोहत्या बंदी कायदा लागू करावा या मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. मोर्चा व सभा शांततेत पार पाडण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे, पोलीस निरीक्षक शेषराव उदार, विजयसिंह राजपूत यांच्यासह अधिकारी, अंमलदारांचा मोठा फौजफाटा तैनात होता.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...

Latest News

Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल... Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...
हिंदू धर्मात गाय पवित्र मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार, घरात गायीची मूर्ती ठेवल्याने आजूबाजूच्या वातावरणावर सकारात्मक परिणाम होतो. असे मानले जाते की...
इंडक्शन कुकर किंवा सिलिंडर मिळत नसेल, तर कमी किमतीत तुमचे जेवण शिजवण्यासाठी वापरा हे गॅझेट्स...
समोर पोलीस चेकिंग सुरू आहे म्हणत दोन भामट्यांचा वृद्धाला गंडा!; २ तोळ्यांची सोनसाखळी घेऊन पसार...
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या
प्रेम प्रकरणात मदत करत असल्याच्या संशयावरून तरुणावर लोखंडी रॉड, बेल्टने बेदम मारहाण, रोहिदासपुऱ्यातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software