- News
- जिल्हा न्यूज
- पाय घसरून तरुण शेतकरी पडला विहिरीत, बुडून मृत्यू, वैजापूरची घटना
पाय घसरून तरुण शेतकरी पडला विहिरीत, बुडून मृत्यू, वैजापूरची घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : शेतात जाताना पाय घसरून कालव्यात पडल्याने प्रवीण संजय वैद्य (वय २२, रा. सवंदगाव, ता. वैजापूर) या शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना वैजापूर तालुक्यातील नगिना पिंपळगाव शिवारात शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) रात्री नऊला घडली. प्रवीणने शेतात कांदा पिकाची लागवड केली असून, पिकाला पाणी भरण्यासाठी तो शेतात जात होता. नांदूर मधमेश्वर कालव्यात तो […]
वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : शेतात जाताना पाय घसरून कालव्यात पडल्याने प्रवीण संजय वैद्य (वय २२, रा. सवंदगाव, ता. वैजापूर) या शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना वैजापूर तालुक्यातील नगिना पिंपळगाव शिवारात शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) रात्री नऊला घडली.
प्रवीणने शेतात कांदा पिकाची लागवड केली असून, पिकाला पाणी भरण्यासाठी तो शेतात जात होता. नांदूर मधमेश्वर कालव्यात तो पाय घसरून पडला. मदतीला कुणीच न आल्याने बुडाला. शनिवारी सकाळी कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. कालव्यात त्याचा मृतदेह दिसून आला. त्याला वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची नोंद वैजापूर पोलिसांनी घेतली आहे. प्रवीणच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
किलेअर्क भागात ड्रग्जचा मोठा साठा जप्त, तस्कराच्याही मुसक्या आवळल्या!
By City News Desk
सिडको पोलिसांचा गौतमनगरात छापा, देशी दारूचा मोठा साठा जप्त
By City News Desk
कोतवालपुऱ्यातून १२ वीत शिकणाऱ्या तरुणीला पळवून नेले...
By City News Desk
परीक्षेशिवाय सरकारी बँकेत नोकरी मिळण्याची संधी, पगार पॅकेजदेखील चांगले
By City News Desk
Latest News
12 Jan 2026 19:39:47
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदार असलेले कामगार-कर्मचारी, अधिकाऱ्यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर...

