हिमरु शाल निर्मितीच्या उद्योगाला गतवैभव, प्राप्त करुन देणार – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

प्रशिक्षण घेतलेल्या १८० पैकी ३६ महिलांचे उद्योग उभारणीसाठी पहिले पाऊल छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : हिमरु शाल निर्मिती हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे वैशिष्ट आहे. हिमरु शाल आजही पसंत केली जाते. त्यामुळे हिमरु शाल निर्मितीला खूप वाव आहे.नुकतेच हिमरु शाल निर्मितीचे प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना प्रोत्साहन, अर्थसहाय्यासाठी मदत व मार्गदर्शन देऊन या उद्योगाला गत वैभव प्राप्त […]

प्रशिक्षण घेतलेल्या १८० पैकी ३६ महिलांचे उद्योग उभारणीसाठी पहिले पाऊल

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : हिमरु शाल निर्मिती हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे वैशिष्ट आहे. हिमरु शाल आजही पसंत केली जाते. त्यामुळे हिमरु शाल निर्मितीला खूप वाव आहे.नुकतेच हिमरु शाल निर्मितीचे प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना प्रोत्साहन, अर्थसहाय्यासाठी मदत व मार्गदर्शन देऊन या उद्योगाला गत वैभव प्राप्त करुन देऊ,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केले.

महाराष्ट्र उद्योजकता प्रशिक्षण केंद्रामार्फत हिमरु शाल निर्मितीचे प्रशिक्षण घेतलेल्या महिलांची बैठक आज नियोजन सभागृहात पार पडली. जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक मंगेश केदार, एमसीईडीचे थावरे आदी यावेळी उपस्थित होते.
माहिती देण्यात आली की, हिमरु शाल निर्मितीचे (हातमागावर) प्रशिक्षण १८० महिलांना देण्यात आले आहे. यापैकी ३६ महिलांनी हिमरु शाल निर्मिती उद्योग टाकण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत प्रस्ताव सादर केला आहे. हे सर्व प्रस्ताव बॅंकांकडे अग्रेषित करण्यात आले आहेत. ७ महिलांचे उद्योग सुरु झाले आहेत. बॅंकांमधून ही प्रकरणे मार्गी लागण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक पार पडली. जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक केदार यांनी प्रत्येक प्रकरण निहाय आढावा घेतला.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, महिलांनी उद्योग उभारणीसाठी पुढे यावे. त्यांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणे आवश्यक आहे. जिल्ह्याचे महत्त्वाचे उत्पादन म्हणून हिमरु शाल निर्मितीला चालना देऊन त्याचे गतवैभव आपण पुन्हा मिळवू. त्यासाठी सगळ्यांनी संयुक्त प्रयत्न करावे. मार्केटींग, ब्रॅण्डींग, लेबलिंग, पॅकेजिंग याबाबत त्यांना संधी व मार्गदर्शन देऊन उत्पादित मालाच्या विक्रीची व्यवस्था करण्यात येईल. त्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना

Latest News

भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भरधाव पिकअप वाहनाने दिलेल्या धडकेत २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना पुरणगाव (ता. वैजापूर)...
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
३ दिवसांपासून बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह आढळला नदीकाठी!; कन्नडच्या घटनेने खळबळ
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software