- News
- सिटी क्राईम
- देवगिरी कॉलेजमध्ये मुलाच्या ॲडमिशनसाठी मागितले २ लाख!; मराठा पित्याने शेतात घेतला गळफास…
देवगिरी कॉलेजमध्ये मुलाच्या ॲडमिशनसाठी मागितले २ लाख!; मराठा पित्याने शेतात घेतला गळफास…
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : देवगिरी कॉलेजमध्ये मुलाच्या ॲडमिशनसाठी २ लाख रुपये मागितले… आर्थिक चणचणीतून फी कशी भरावी, या विवंचनेतून पित्याने गुरुवारी (२७ जून) सकाळी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना लाडसावंगी (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे घडली. मुलाला बारावीत ९२ टक्के गुण मिळूनही प्रवेशासाठी २ लाख रुपये मोजावे लागत आहेत. मराठ्यांना आरक्षण नसल्याने […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : देवगिरी कॉलेजमध्ये मुलाच्या ॲडमिशनसाठी २ लाख रुपये मागितले… आर्थिक चणचणीतून फी कशी भरावी, या विवंचनेतून पित्याने गुरुवारी (२७ जून) सकाळी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना लाडसावंगी (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे घडली. मुलाला बारावीत ९२ टक्के गुण मिळूनही प्रवेशासाठी २ लाख रुपये मोजावे लागत आहेत. मराठ्यांना आरक्षण नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे, असे मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पडूळ यांनी म्हटले आहे.
जातप्रमाणपत्र काढण्यासाठी तहसीलदार रमेश मुंडलोड, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांनी खासरापत्र, भूमिअभिलेख विभागातील नोंदी तपासण्यासाठी पडूळ यांच्याकडे पैशांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार मुंडलोड यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाचे पदाधिकारी रमेश गायकवाड, अशोक मोरे, रेखा वहाटुळे, प्रा. चंद्रकांत भराड, विजय औताडे, सचिन मिसाळ, सुनील कोटकर यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. तहसीलदार मुंडलोड, उपविभागीय अधिकारी राठोड यांनी पंचनाम्याला विलंब केला, उध्दट भाषा वापरली, असा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. यासंदर्भातील वृत्त आजच्या अंकात एका प्रसिद्ध दैनिकाने दिले आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
By City News Desk
Latest News
14 Mar 2026 17:16:35
हिंदू धर्मात गाय पवित्र मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार, घरात गायीची मूर्ती ठेवल्याने आजूबाजूच्या वातावरणावर सकारात्मक परिणाम होतो. असे मानले जाते की...

