अरविंद देशमुखांसारखे सर्वसमावेशक नेतृत्व पुढे आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत; आमदार अर्जुन खोतकर यांचे प्रतिपादन, मराठा क्रांती मोर्चा व सामाजिक संघटनांतर्फे अरविंद देशमुख यांचा गौरव

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

जालना (विशेष प्रतिनिधी) : आजच्या गढूळ सामाजिक वातावरणात अठरापगड जातींना सोबत घेऊन फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार आणि कृतीचा सेतू उभारणारे सर्वसमावेशक नेतृत्व म्हणजे अरविंद देशमुख, असे गौरवोद्‌गार आमदार अर्जुन खोतकर यांनी काढले. अशा सर्वसमावेशक नेतृत्वाला पुढे आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, अशी ग्वाही देत अरविंद देशमुख यांना स्वीकृत सदस्य म्हणून महापालिकेत प्रतिनिधित्व देण्याबाबत विविध सामाजिक संघटनाच्या वतीने मराठा सेवा संघाचे सोपानराव तेलगड केलेल्या मागणीच्या अनुषंगाने बोलताना आपली काही अडचण आणि हरकत नाही. भाजपाचे भास्करराव दानवे यांनीही यासाठी आपला अधिकार वापरावा, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या विभागीय सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल अरविंद बाळासाहेब देशमुख यांचा रविवारी (१९ ऑक्टोबर) मराठा सेवा संघ कार्यालयात मराठा क्रांती मोर्चा आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात आमदार खोतकर बोलत होते. व्यासपीठावर सत्कारमूर्ती अरविंद देशमुख यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर, भाजपाचे महानगर अध्यक्ष भास्करराव दानवे, मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक डॉ. संजय लाखे, राजेश राऊत, मराठा सेवा संघाचे प्रा. सोपानराव तेलगड, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, ज्येष्ठ समाजसेवी इकबाल पाशा, अंकुशराव राऊत, पंडितराव भुतेकर, शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले, डॉ. जगन्नाथ खंडागळे, जिल्हा बाल व स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गवारे, जगन्नाथ काकडे, संतोष गाजरे, इब्राहिम शेख, किशोर गरदास, राजेंद्र जाधव आदींची उपस्थिती होती.

WhatsAppImage2025-10-20at9.02.14AM

आमदार खोतकर म्हणाले, की अरविंद देशमुख हे फक्त मराठा समाजाचे कार्यकर्ते नाहीत तर ते समाजातील प्रत्येक घटकासाठी लढणारे कार्यकर्ते आहेत. त्यांनी सामाजिक चळवळीसह क्रीडा क्षेत्रातही विशेष ठसा उमटवला आहे. त्यांच्या सत्काराचा अर्थ म्हणजे समाजाने एका अथक योद्ध्याच्या पाठीवर प्रेमाची थाप दिली आहे. भास्करराव दानवे म्हणाले, की अडचणीच्या काळात धावून जाणारा, लोकांसाठी नेहमी उपलब्ध असणारा कार्यकर्ता म्हणजे अरविंद देशमुख. भास्करराव आंबेकर म्हणाले, की राजकारणात चिखल निर्माण झाला असला, तरी अरविंद देशमुख हे त्या गढूळ वातावरणात दीपस्तंभासारखे आहेत. समाजाला योग्य दिशा दाखवणारे असे व्यक्तिमत्व दुर्मीळच असते. डॉ. संजय लाखे यांनी म्हणाले की, फुले- शाहू- आंबेडकरांच्या विचारावर आधारित सामाजिक वीण पुन्हा जोडण्याचे कार्य देशमुख करत आहेत. अठरापगड जातीला एकत्र आणून त्यांनी समाजाला बळ दिले आहे. या वेळी सोपानराव तेलगड, राजेश राऊत, अनंत कुलकर्णी आदी मान्यवरांनी अरविंद देशमुख यांच्या सामाजिक चळवळीतील कार्याचा गौरव केला.

सत्काराला उत्तर देताना अरविंद देशमुख भावनिक झाले. ते म्हणाले, स्व. अण्णासाहेब पाटील यांनी १९८० साली हमाल-मापाडी आणि अठरापगड जातीला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी मराठा महासंघाची स्थापना केली. त्यांच्या शिकवणीप्रमाणेच मी आणि माझे सहकारी कार्य करत आहे. आज या सन्मानामुळे माझ्या घरच्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या प्रेमाची ऊब जाणवली. मी कुठल्याही परिस्थितीत मराठा महासंघाचे समाजकार्य सोडणार नाही. राष्ट्रीय पातळीवरील जबाबदारीचा उपयोग मी सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठीच करणार आहे. खुर्ची मिळाली तरी मराठा महासंघ कधीच सोडणार नाही, ही माझी शपथ आहे, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अशोक पडूळ यांनी केले. त्यांनी सांगितले, की अरविंद देशमुख यांची मराठा महासंघातील कारकीर्द तब्बल २२ वर्षांची असून, गेली १७ वर्षे ते अध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत. त्यांच्यामुळेच आज माझी ओळख असून माझे ते सामाजिक गुरु आहेत, असे ते म्हणाले. या वेळी तब्बल १८ सामाजिक आणि सर्वधर्मीय संघटनांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे दिव्यांग बांधवही मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशमुख यांनी त्यांच्या हक्कांसाठी वेळोवेळी आवाज उठवून दिल्याबद्दल त्यांनी या कार्यक्रमात कृतज्ञतेने शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय देठे यांनी केले. आभार शुभम टेकाळे यांनी मानले. संपूर्ण जालना जिल्ह्यातून मराठा समाज बांधव, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट

Latest News

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील गांधेली येथे मंगळवारी (१० मार्च) रात्री ९ च्या सुमारास हभप निवृत्ती...
सोशल मीडियातून ओळख, प्रेम, ४ महिने सहवास, नंतर जातीवरून युवतीला लाथाबुक्क्या!; प्रियकरासह त्याची आई, दोन बहिणी, भावाविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’, पाचोडची घटना
भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software