महापालिकेत ५ वर्षे भाजपचाच महापौर असणार : मंत्री अतुल सावे, शिंदे गटाला सोबतच ठेवणार, मंत्री शिरसाट काय म्हणाले...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिकेत पाच वर्षे भाजपचा महापौर असणार आहे. शिंदे गट आमचा मित्रपक्ष असल्याने त्यांना सोबतच ठेवू. शिंदे गट आमच्या सोबतच राहील. विजयाचे शिल्पकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. ‘टॉक शो'मध्ये त्यांनी शहराच्या विकासासाठी जो आराखडा दाखवला, त्यानुसारच पुढील पाच वर्षांत आम्ही काम करणार आहोत, अशी प्रतिक्रिया निवडणूक प्रमुख तथा मंत्री अतुल सावे यांनी अभूतपूर्व विजयानंतर दिली आहे.

युती तुटण्याची कारणे आणि निवडणुकीनंतरची परिस्थिती या दोन्ही वेगवेगळ्या बाबी आहेत. युती तुटल्यानंतर दुःख झाले, परंतु आमच्या समन्वय समितीने पूर्ण ताकदीने प्रचाराची धुरा सांभाळली, असे सांगून सावे म्हणाले, की ४५ हून अधिक जागा येतील, अशी अपेक्षा होती. काही जागा थोडक्यात येतील, असे वाटले होते. मात्र मतदारांनी शहराच्या विकासासाठी कौल दिला. यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे.

पालकमंत्र्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली
अनपेक्षित निकालावर व्यक्त होताना पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले, की पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही, याची जबाबदारी मी स्वीकारतो. माझी मुले निवडून यावीत हे माझे टार्गेट कधीच नव्हते. पक्ष जिंकणे हे महत्त्वाचे होते. अंतर्गत राजकारण, ज्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायला हवे होते तिथे दुर्लक्ष झाल्याचा फटका आम्हाला बसला आहे. एखाद्या वेळेस अशी लाट येते की त्याला सामोरे जावेच लागते, असे शिरसाट म्हणाले.

अंबादास दानवे म्हणाले, खचून जाणार नाही..!
ठाकरे गटाचे केवळ ६ नगरसेवक निवडून आले. मोठ्या दारुण पराभावामागे आ. अंबादास दानवे यांची अपयशी ठरलेली रणनिती कारणीभूत मानली जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना आ. दानवे म्हणाले, की हा पराभव जनतेच्या कौलापेक्षा सत्तेच्या आणि पैशाच्या वापराचा अधिक आहे. निवडणुकीत ‘धो-धो' पैशाचा पाऊस आणि ईव्हीएमचा घोळ करण्यात आला. भाजपच्या आकाशातून अक्षरशः पैशांची वृष्टी झाली. मतदानाच्या दिवशी १५ जानेवारीला काही ठिकाणी ईव्हीएम रिसेट झाल्याच्या आणि २५ टक्के मतदानाच्या संशयास्पद घटनांच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. भाजपने त्यांच्यासोबत असलेल्या सहकारी पक्षाला तरी संपवायला नको होते. खचून न जाता, अधिक जोमाने कामाला लागू, असे दानवे म्हणाले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ

Latest News

छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यातून ५ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील ३...
प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना
गव्हाबरोबर गांजा वाढवला... पोलिसांचा शेतात छापा, ५ लाखांचा गांजा जप्त, शेतकऱ्याला अटक, करमाडजवळील कारवाई
वाळूज MIDC तील कमळापुरात दोन गटांत सशस्त्र हाणामारी; ४ गंभीर जखमी, वरिष्ठ पोलिसांचा फौजफाटा घटनास्‍थळी, परिस्थितीवर नियंत्रण (व्हिडीओसह)
१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software