अंतिम केलेल्या प्रभाग रचना आराखड्यावर ‘मविआ’ नाखुश, महायुतीचे लक्ष्य लढण्यावर...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने अंतिम केलेल्या प्रभाग रचना आराखड्यावर महाविकास आघाडी समाधानी नाही. महायुतीच्या उमेदवारांना लाभ होईल अशी रचना कायम ठेवल्याचा आरोप ठाकरे गट आणि काँग्रेसने केला आहे, तर महायुती मात्र आराखड्यावर समाधानी असून, रचना पाहण्यापेक्षा आम्ही लढण्याचा लक्ष्य केंद्रीत करतो, असा टोला शिंदे गट, भाजपने लगावला आहे.

महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगात जोमाने कामाला लागले आहे. प्रारूप प्रभाग रचनेच्या आराखड्यावर ५५२ आक्षेप आले होते. त्यावर गेल्या महिन्यात सुनावणी घेण्यात आली होती. प्रभागरचना किरकोळ बदलांसह अंतिम करण्यात आली आहे. अंतिम प्रभाग रचनेचे गॅझेट प्रसिद्ध केले आहे. आता या आराखड्यावरून महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात निवडणुकीआधीच संघर्ष पेटला आहे. अंतिम केलेल्या आराखड्यात खूप मोठे बदल केलेले नाहीत. महायुतीच्या उमेदवांना फायदा होईल अशीच रचना कायम ठेवली आहे, असा आरोप ठाकरे गटाचे महानगरप्रमुख राजू वैद्य आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख युसूफ यांनी केलाप आहे.

अंतिम आराखड्यातील काही बदल जाणून घ्या...
-प्रभाग क्रमांक २ मध्ये भारत मातानगर एन-१२, छत्रपतीनगर, एन-२, सारा वैभव, महमूदपुरा, फरहतनगर, एन-१३ भागशः समावेश.
-प्रभाग क्र. ३ मध्ये गणेश कॉलनी भागशः, एन-१२ चाऊस कॉलनी, हिमायत बागचा समावेश.
-प्रभाग क्र. ८ मध्ये मारुतीनगर, भवानीनगर, नारेगाव भागशः समावेश.
-प्रभाग क्र. ९ मध्ये चिकलठाणा भागशः, सावित्रीनगर, पटेलनगर, वसंतनगर अंशतः, मिसारवाडी भागशः वाढविला.
-प्रभाग क्र. १० मध्ये ५ अष्टविनायकनगर, मायवर्ल्ड सावरकरनगर, आदी भागांचा समावेश केला आहे.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना

Latest News

भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भरधाव पिकअप वाहनाने दिलेल्या धडकेत २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना पुरणगाव (ता. वैजापूर)...
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
३ दिवसांपासून बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह आढळला नदीकाठी!; कन्नडच्या घटनेने खळबळ
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software