सरकारच्या नाकात दम करणाऱ्या मराठा आंदोलक राजश्री उंबरे यांचे १४ व्या दिवशी उपोषण मागे; सरकारला २ आठवड्यांची मुदत, आज मध्यरात्रीपासून मनोज जरांगे उपसणार उपोषणास्‍त्र

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते आणि पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत मराठा आंदोलक राजश्री उंबरे यांनी रविवारी (१५ सप्‍टेंबर) रात्री १४ व्या दिवशी सरबत पिऊन उपोषण सोडले. मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सरकारला दोन आठवड्यांची मुदत उंबरे यांनी सरकारला दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तुमच्याच समाजाचे आहेत. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते आणि पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत मराठा आंदोलक राजश्री उंबरे यांनी रविवारी (१५ सप्‍टेंबर) रात्री १४ व्या दिवशी सरबत पिऊन उपोषण सोडले. मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सरकारला दोन आठवड्यांची मुदत उंबरे यांनी सरकारला दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तुमच्याच समाजाचे आहेत. शेवट नक्की गोड होईल, असे मंत्री केसरकर म्हणाले. मुख्यमंत्रीपद संवैधानिक पद असल्याने ते राज्यातील नागरिकांचे प्रतिनिधीत्व करतात. केसरकरांच्या वक्‍तव्‍याने या पदालाच जातीत विभागले गेल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्‍यता आहे.

राजश्री उंबरे यांनी २ सप्टेंबरपासून क्रांती चौकात उपोषण सुरू केले होते. त्यांच्या शिष्टमंडळाला सरकारने चर्चेसाठी पाचारण केले होते. दोन दिवसांपूर्वी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात शिष्टमंडळाने चर्चा केली. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी शासनाचे शिष्टमंडळ उंबरे यांच्याशी चर्चा करायला छत्रपती संभाजीनगरात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार रविवारी रात्री आठला शिक्षणमंत्री केसरकर, पालकमंत्री सत्तार यांनी उपोषणस्थळी आले. त्यांनी राजश्री उंबरे यांच्यासोबत चर्चा केली.

मनोज जरांगे आणि राजश्री उंबरे या दोन्ही आंदोलकांच्या मागण्या एकसारख्या आहेत. यामुळे या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री सकारात्मक असल्याने तेच हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात घोषणा करतील. यासाठी दोन आठवडे मुदत देण्याची विनंती केसरकर यांनी केली. अन्य मागण्याही सोडविण्याचेही आश्वासन त्यांनी दिले व उपोषण मागे घेण्याची विनंती केली. या वेळी उपोषणकर्त्यांच्या वतीने किशोर चव्हाण, प्रा. रवींद्र बनसोड, बाळराजे आवारे आणि गणेश उगले यांनी मंत्र्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसींमध्ये समावेश करावा. शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या मुलांना मोफत शिक्षण द्यावे आणि ईडब्ल्यूएस आरक्षण पूर्ववत ठेवावे या मागण्यांसाठी राजश्री उंबरे यांचे उपोषण सुरू होते.

आज मध्यरात्रीपासून जरांगे यांचे उपोषण
गेले १४ दिवस सरकारच्या नाकात दम करणाऱ्या राजश्री उंबरे यांचे उपोषण सोडविण्यात सरकारला यश आले असले तरी, आता मनोज जरांगे आंदोलनाला सज्‍ज झाले आहेत. ते आज, १६ सप्‍टेंबरच्या मध्यरात्री १२ पासून बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. राजश्री उंबरे यांच्या उपोषणाला मिळालेला मराठा बांधवांचा प्रतिसाद आणि त्यामुळे प्रशासनाची झालेली धावपळ आणि लगेचच मनोज जरांगे यांचे उपोषण यामुळे सरकारला थोडीही उसंत मिळत नसल्याचे चित्र आहे. जरांगे यांनी आजपर्यंत ५ उपोषण केले असून, त्यांचे हे सहावे उपोषण असेल.0

भुमरेंची जरांगेंशी भेट…
छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची रविवारी दुपारी भेट घेतली. यावेळी दोघांत अडीच तास चर्चा झाली. जरांगे यांनी भुमरेंवर टीका केली होती. त्यानंतर भुमरे लगबगीने जरांगे यांच्या भेटीला गेले. समाजाच्या हितावर आमची चर्चा झाल्याचे भुमरे म्हणाले. चर्चेचा तपशील मात्र समोर आणण्यात आला नाही.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना

Latest News

भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भरधाव पिकअप वाहनाने दिलेल्या धडकेत २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना पुरणगाव (ता. वैजापूर)...
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
३ दिवसांपासून बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह आढळला नदीकाठी!; कन्नडच्या घटनेने खळबळ
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software