- News
- पॉलिटिक्स
- छ. संभाजीनगरमध्ये काँग्रेस-ठाकरे गटात बिनसले!; डॉ. काळे म्हणाले, लोकसभेत हरला आहात हे लक्षात ठेवा, उ...
छ. संभाजीनगरमध्ये काँग्रेस-ठाकरे गटात बिनसले!; डॉ. काळे म्हणाले, लोकसभेत हरला आहात हे लक्षात ठेवा, उमेदवारही नसताना जागा काय मागता?; तनवाणींचे प्रत्युत्तर, आमच्याकडे काँग्रेसपेक्षाही सक्षम उमेदवार, तुमच्या जालन्यातील विजयात आमचा जास्त ‘हातR
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भाजपसोबत लहान भाऊ, मोठा भाऊ… अशी कुस्ती खेळल्यानंतर आता ठाकरे गटाला काँग्रेससोबतही हाच संघर्ष करावा लागत आहे. राज्यस्तरावरील नेते एकमेकांवर टीका करत असताना स्थानिक पातळीवरही हा संघर्ष उफाळून आला असून, खा. डॉ. कल्याण काळे यांनी ठाकरे गटाला चांगलेच सुनावले. छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभेला हरले होते, हे जागा वाटपात लक्षात ठेवा. इतर […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भाजपसोबत लहान भाऊ, मोठा भाऊ… अशी कुस्ती खेळल्यानंतर आता ठाकरे गटाला काँग्रेससोबतही हाच संघर्ष करावा लागत आहे. राज्यस्तरावरील नेते एकमेकांवर टीका करत असताना स्थानिक पातळीवरही हा संघर्ष उफाळून आला असून, खा. डॉ. कल्याण काळे यांनी ठाकरे गटाला चांगलेच सुनावले. छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभेला हरले होते, हे जागा वाटपात लक्षात ठेवा. इतर पक्षांतून लोक आयात करून उमेदवारी मिळाल्यागत ते प्रचारही करत असल्याचे शरसंधान डॉ. काळे यांनी साधले. त्यांना लगोलग ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांनी प्रत्युत्तरही दिले. आमच्याही सर्व ९ मतदारसंघांत उमेदवार तयार असल्याचे ते म्हणाले. एकूणच महाविकास आघाडीतील या घटक पक्षांतील वाद पुढे कोणत्या वळणावर जातो, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. निवडणुकीत एकमेकांचे उमेदवार जिंकविण्याऐवजी पाडापाडीचे वेध लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.
नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यातील शीतयुद्ध स्थानिक पातळीवरही उतरले आहे. डॉ. कल्याण काळे यांनी ठाकरे गटाला थेट सुनावले. विधानसभेतच जागा वाढवून मागा. पुढे महापालिका निवडणूक आहे. आता त्यांचे आमदार जास्त आले तर महापालिकेतही ते जागा जास्त मागतील. ते दबंगगिरी करतील. ठाकरे गट लोकसभा निवडणुकीत हरला हे लक्षात असू द्या. तिथे उमेदवारही नाही, तिथे जागा कशी मागता, असा सवाल त्यांनी केला.
तनवाणी म्हणाले, काँग्रेसपेक्षा आमच्याकडे सक्षम उमेदवार…
डॉ. कल्याण काळे यांनी ठाकरे गटासोबत थेट पंगा घेतल्याने ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांनीही त्यांना खडे बोल लगावले. आमच्याकडे सर्व ९ मतदारसंघांत उमेदवार तयार आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक आमदार शिवसेनेचे निवडून आले आहेत. आमच्याकडे काँग्रेसपेक्षा सक्षम उमेदवार आहेत. कल्याण काळेंच्या जालन्यातील विजयात ठाकरे गटाचा जास्त वाटा होता हे त्यांनी लक्षात ठेवावे, असे तनवाणी यांनी काळेंना सुनावले.

