अरेरेऽऽ आईच्या निधनाची बातमी कळताच मुलाने १५ मिनिटांत सोडले प्राण!; सिल्लोडची हृदयद्रावक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : आईच्या निधनाची बातमी कळताच विरह असह्य झालेल्या मुलानेही प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना सिल्लोडमध्ये समोर आली आहे. अवघ्या १५ मिनिटांच्या अंतराने मायलेकाचा मृत्‍यू झाला. सुभद्राबाई भीमराव भाग्यवंत (वय ९५) व कचरू भीमराव भाग्यवंत (वय ५५) अशी मृत्‍यू झालेल्या मायलेकरांची नावे आहेत. ते शहरातील गणेश कॉलनी भागात राहत होते. गुरुवारी (४ जुलै) दुपारी […]

सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : आईच्या निधनाची बातमी कळताच विरह असह्य झालेल्या मुलानेही प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना सिल्लोडमध्ये समोर आली आहे. अवघ्या १५ मिनिटांच्या अंतराने मायलेकाचा मृत्‍यू झाला.

सुभद्राबाई भीमराव भाग्यवंत (वय ९५) व कचरू भीमराव भाग्यवंत (वय ५५) अशी मृत्‍यू झालेल्या मायलेकरांची नावे आहेत. ते शहरातील गणेश कॉलनी भागात राहत होते. गुरुवारी (४ जुलै) दुपारी ३:४५ वाजता आईचा तर ४ वाजता मुलाचा मृत्‍यू झाला. काही दिवसांपासून दोघेही आजारी होते. आईच्या निधनाची बातमी कळताच छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेणारा त्यांचा मुलगा कचरू यांनीही प्राण सोडले.

आई व मुलाच्या पार्थिवावर गुरुवारी रात्री सिल्लोड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सुभद्राबाई दोन वर्षांपासून आजारी होत्या, तर मुलगा कचरू यांना ८ जून रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची अॅन्जिओप्लास्टी झाली होती. यामुळे छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात ते उपचार घेत होते. सुभद्राबाई यांच्या पश्चात तीन मुले, सुना तर कचरू यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, दोन मुले असा परिवार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विश्लेषण : अंबादास दानवेंची ‘दादा’गिरी चुकीचीच!; उमेदवार निवडून आणता येत नाहीत, जे निवडून आले त्यांना सांभाळता येत नाहीत मग दुसऱ्यावर त्रागा करून उपयोग काय?

Latest News

विश्लेषण : अंबादास दानवेंची ‘दादा’गिरी चुकीचीच!; उमेदवार निवडून आणता येत नाहीत, जे निवडून आले त्यांना सांभाळता येत नाहीत मग दुसऱ्यावर त्रागा करून उपयोग काय? विश्लेषण : अंबादास दानवेंची ‘दादा’गिरी चुकीचीच!; उमेदवार निवडून आणता येत नाहीत, जे निवडून आले त्यांना सांभाळता येत नाहीत मग दुसऱ्यावर त्रागा करून उपयोग काय?
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्‍ट वृत्तसेवा) : विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते, माजी आमदार तथा ठाकरे गटाचे जिल्‍हाप्रमुख अंबादास दानवे यांनी...
आरटीओ कार्यालयातच भीषण दुर्घटना : चालकाने ट्रक मागे घेताना निष्काळजीपणा केला अन्‌ एजंटचा चाकाखाली येऊन मृत्यू!
व्हिडीओ : बजाजनगरात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, सीसीटीव्हीत थरार कैद
भाजपची खेळी, इतर पक्षांची बसली दातखिळी!; जिल्ह्यातील ९ पैकी ६ पं.स.चे सभापतिपद केले काबिज, जाणून घेऊ राजकारण कसे रंगले...
रिलस्टार अरुण तुपेचा घरातच आढळला मृतदेह!; सोशल मीडियावर दोन लाख फॉलोअर्स, पोस्ट मार्टेमच्या अंतिम अहवालातून समोर येणार कारण, पोलीस काय म्हणाले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software