- News
- जिल्हा न्यूज
- स्वदेशीला प्राधान्य द्या, आत्मनिर्भर व्हा : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे आवाहन, गंगापूरमध्ये भव्य
स्वदेशीला प्राधान्य द्या, आत्मनिर्भर व्हा : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे आवाहन, गंगापूरमध्ये भव्य हिंदू संमेलन
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : समानता केवळ ओठात नको, कृतीत हवी आहे. त्यासाठी सगळ्या जातीपातीतील आपले मित्र केले पाहिजे. समाजात सद्भावना असायला हवी. कुटुंबात आपल्या संस्कार, परंपरांची चर्चा करायला हवी. जगताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी केली पाहिजे. विदेशी वस्तूंचा वापर करण्यापेक्षा स्वदेशीला प्राधान्य दिले पाहिजे. आपल्याला आत्मनिर्भर व्हायचे आहे. आत्मनिर्भर झालो तर आपल्या शक्तीला अर्थ राहील, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गंगापूरमध्ये आज, १६ जानेवारीला सायंकाळी केले.

कोण काय म्हणाले?
ह.भ.प. गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मान अपमान सहन करत शंभर वर्षांचा प्रवास केला आहे. जातीपातीत विभागलेल्या हिंदू समाजाचे त्यांनी संघटन केले. आता हिंदू समाजाने सामाजिक एकोपा ठेवून वाटचाल करावी.
ह.भ.प. गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज : आपल्याला संघटित रहावे लागेल. आपल्या समाजातील जातीवादाचे समूळ उच्चाटन करावे लागेल.
जगद्गुरू श्रीश्री १००८ स्वामी शांतिगिरीजी महाराज : समाजाने आपल्या संस्कृतीचे आचरण करणे आवश्यक आहे. विदेशी संस्कृतीच्या आहारी गेल्यामुळे आपली पिढी चुकीच्या मार्गाला जात आहे. आपले कुटुंब सुसंस्कृत करा, ज्यामुळे आपला समाज सुरक्षित होईल.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध
By City News Desk
Latest News
04 Mar 2026 09:21:01
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यातून ५ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील ३...

