स्वदेशीला प्राधान्य द्या, आत्मनिर्भर व्हा : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे आवाहन, गंगापूरमध्ये भव्य हिंदू संमेलन

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : समानता केवळ ओठात नको, कृतीत हवी आहे. त्यासाठी सगळ्या जातीपातीतील आपले मित्र केले पाहिजे. समाजात सद्‌भावना असायला हवी. कुटुंबात आपल्या संस्कार, परंपरांची चर्चा करायला हवी. जगताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी केली पाहिजे. विदेशी वस्तूंचा वापर करण्यापेक्षा स्वदेशीला प्राधान्य दिले पाहिजे. आपल्याला आत्मनिर्भर व्हायचे आहे. आत्मनिर्भर झालो तर आपल्या शक्तीला अर्थ राहील, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गंगापूरमध्ये आज, १६ जानेवारीला सायंकाळी केले.

हिंदू संमेलन समितीतर्फे गंगापूर शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर भव्य हिंदू संमेलन आयोजित केले होते. संमेलनात डॉ. भागवत यांनी मार्गदर्शन केले. ह.भ.प. गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज (श्री क्षेत्र देवगड संस्थान), ह.भ.प. गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज (मठाधिपती, गोवर्धन धाम, श्री क्षेत्र सरलाबेट), जगद्‌गुरू श्रीश्री १००८ स्वामी शांतिगिरीजी महाराज (जगद्‌गुरू श्री जनार्दन स्वामी आश्रम, श्री क्षेत्र वेरूळ) यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील छत्रे यांनी केले. त्यांनी या संमेलनाची पार्श्वभूमी मांडली. या वेळी डॉ. भागवत म्हणाले, की जगाला हेवा वाटेल असा चारित्र्यसंपन्न बलशाली समाज आपल्याला घडवावा लागेल. त्यासाठी आपला स्वभाव आणि आचरण तसे करावे लागेल. भारताच्या भविष्यासाठी हिंदू समाजच जबाबदार आहे. त्यासाठी हिंदू समाजाने स्वतःच्या आचरणातून समाज परिवर्तन घडवून आणण्याचे आवाहन त्यांनी केले.

WhatsAppImage2026-01-16at9.03.04PM
कोण काय म्हणाले?
ह.भ.प. गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मान अपमान सहन करत शंभर वर्षांचा प्रवास केला आहे. जातीपातीत विभागलेल्या हिंदू समाजाचे त्यांनी संघटन केले. आता हिंदू समाजाने सामाजिक एकोपा ठेवून वाटचाल करावी.
ह.भ.प. गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज : आपल्याला संघटित रहावे लागेल. आपल्या समाजातील जातीवादाचे समूळ उच्चाटन करावे लागेल.
जगद्‌गुरू श्रीश्री १००८ स्वामी शांतिगिरीजी महाराज : समाजाने आपल्या संस्कृतीचे आचरण करणे आवश्यक आहे. विदेशी संस्कृतीच्या आहारी गेल्यामुळे आपली पिढी चुकीच्या मार्गाला जात आहे. आपले कुटुंब सुसंस्कृत करा, ज्यामुळे आपला समाज सुरक्षित होईल.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ

Latest News

छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यातून ५ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील ३...
प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना
गव्हाबरोबर गांजा वाढवला... पोलिसांचा शेतात छापा, ५ लाखांचा गांजा जप्त, शेतकऱ्याला अटक, करमाडजवळील कारवाई
वाळूज MIDC तील कमळापुरात दोन गटांत सशस्त्र हाणामारी; ४ गंभीर जखमी, वरिष्ठ पोलिसांचा फौजफाटा घटनास्‍थळी, परिस्थितीवर नियंत्रण (व्हिडीओसह)
१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software