- News
- सिटी डायरी
- छ. संभाजीनगरात आता ‘फेरफार’ होणार झटपट, जिल्हाधिकाऱ्यांची सुधारित कार्यपद्धती लागू
छ. संभाजीनगरात आता ‘फेरफार’ होणार झटपट, जिल्हाधिकाऱ्यांची सुधारित कार्यपद्धती लागू
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ व नियम १९७१ अन्वये प्रत्येक गावात ठेवण्यात येणाऱ्या अधिकार अभिलेखांमध्ये फेरफार प्रक्रिया पारदर्शक व गतिमान जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सुधारीत कार्यपद्धती लागू करण्याचे निर्देश सर्व महसूल यंत्रणेला दिले आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ व नियम १९७१ अन्वये प्रत्येक गावात ठेवण्यात येणाऱ्या अधिकार अभिलेखांमध्ये फेरफार […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ व नियम १९७१ अन्वये प्रत्येक गावात ठेवण्यात येणाऱ्या अधिकार अभिलेखांमध्ये फेरफार प्रक्रिया पारदर्शक व गतिमान जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सुधारीत कार्यपद्धती लागू करण्याचे निर्देश सर्व महसूल यंत्रणेला दिले आहेत.
तक्रारीची पात्रता तपासणी : एखाद्या फेरफार प्रकरणावर तक्रार/हरकत नोंदविणाऱ्या व्यक्तीचा त्या जमिनीशी कायदेशीर संबंध आहे की नाही, याची प्राथमिक तपासणी केली जाईल. संबंध नसल्यास तक्रार अमान्य मानून सुनावणीस पात्र ठरवले जाणार नाही.
फक्त वैध तक्रारींवरच सुनावणी : केवळ हितसंबंधित किंवा नोंदणीमध्ये प्रत्यक्ष सहभाग असलेल्या व्यक्तीच्या तक्रारीवरच सुनावणी घेतली जाणार आहे.
बिनआधार तक्रारींवर कारवाई : जाणूनबुजून चुकीच्या किंवा बिनआधार तक्रारी करून प्रक्रिया अडवणाऱ्या व्यक्तींवर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अशा प्रकरणांचा नोंदवहीत समावेश करून वरिष्ठ कार्यालयास अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या सुधारित धोरणामुळे फेरफार प्रक्रिया अधिक प्रभावी, गतिमान व कायदेशीरदृष्ट्या अधिक बळकट होणार आहे. नागरिकांना वेळेत व अचूक सेवा मिळणे सुनिश्चित होणार असून, महसूल विभागाच्या पारदर्शकतेत वाढ होईल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. सर्व ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांनी सुधारित कार्यपद्धतीचे काटेकोरपणे पालन करावे. कोणतेही फेरफार प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अन्यथा जबाबदार अधिकाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही आदेशात स्पष्ट म्हटले आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
चार मानवी दोष, जे एखाद्याला यशाच्या मार्गापासून नेतात दूर...
By City News Desk
गोरक्षकांनी केंब्रीज चौकात पकडला गोवंशाचे मांस घेऊन जाणारा ॲपेरिक्षा
By City News Desk
हर्सूल टी पॉइंटवर हिट ॲन्ड रन; दुचाकीस्वाराला उडवून कार पसार...
By City News Desk
भाडेकरूने केला घरमालकिनीचा विश्वासघात, नवनाथनगरात काय घडलं...
By City News Desk
राजेंद्र जंजाळ-मंत्री शिरसाटांतील तणाव शिगेला!
By City News Desk
सेंट्रल नाक्यावर नायलॉन मांजाने चिरला ३ वर्षीय चिमुकल्याचा गळा!
By City News Desk
Latest News
07 Dec 2025 16:44:09
भारतात सरकारी नोकऱ्यांची मोठी क्रेझ आहे. लाखो तरुण एमपीएससी, यूपीएससी, बँका, पोलीस, शिक्षक, रेल्वे इत्यादींमध्ये भरतीसाठी तयारी करतात. देशात सरकारी...

