घरातून पळून जाऊन लग्न केले, दोन महिन्यांत प्रेम आटलं, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून २० वर्षीय तरुणीला घरातून हाकलले!; वाळूज MIDC तील अजब प्रेम की विचित्र कहानी...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : प्रेम केलं, त्याच्यावर विश्वास ठेवून तिनं घर सोडलं... पळून जाऊन आळंदीत लग्न केलं. लग्नानंतर मात्र दोनच महिन्यांत तो इतका बदलला, की पैशांसाठी आता तिला लाथाबुक्‍क्‍यांनी बेदम मारहाण करून घरातून हाकलून दिले आहे. ही अजब प्रेम की गजब कहानी वाळूज एमआयडीसीतील वडगाव कोल्हाटीत समोर आली आहे. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तिच्या पती आणि सासूविरुद्ध सोमवारी (६ ऑक्‍टोबर) गुन्हा दाखल केला आहे.

सौ. पल्लवी प्रदीप मापारी (वय २०, रा. ह. मु. वडगाव कोल्हाटी अण्णाभाऊ साठे चौक, मूळ गाव मंगरूळ ता. चिखली, जि. बुलडाणा) या विवाहितेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. वाळूज हॉस्पिटलमधील आयसीयूमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिने पोलिसांना जबाब दिला, की ती बी. कॉम. सेकंड इयरला असून,  विवेकानंद महाविद्यालयात शिकते. तिचे लग्न प्रदिप अशोक मापारी (वय २४, रा. कमळापूर फाटा) याच्याशी १६ ऑगस्ट २०२५ रोजी पुण्यातील आळंदीत झाले. त्यांचा आंतरजातीय प्रेमविवाह आहे. लग्नाची माहिती तिच्या आई-वडिलांना नव्हती. मात्र नंतर त्यांनी लेकीच्या आनंदासाठी सहमती दिली.

तिची सासू सौ. मीरा अशोक मापारी (रा. वडगाव कोल्हाटी), सासरे अशोक मापारी यांना लग्नाची माहिती होती. लग्नानंतर १० ते १५ दिवस पती व सासरच्यांनी तिला चांगले नांदवले. त्यानंतर सासू मीराबाई मापारी म्हणत होत्या की, माझ्या मुलाला तुझ्या आई- वडिलांनी काही एक भेटवस्तू दिली नाही. लग्न करून द्यायला पाहिजे होते. त्या पल्लवीला जेवायला देत नसत. तुला घरातील काही एक काम जमत नाही. तुला साधा स्वयंपाक सुध्दा येत नाही, असे म्हणून शिवीगाळ करू लागल्या.

पती प्रदीपला एकाचे दोन सांगून त्याला भडकावून देत पल्लवीला शिवीगाळ करून मारहाण करायला लावत होत्या. घर बांधण्यासाठी एक लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी सुरू केली. आई- वडील गरीब असल्याचे सांगून सुध्दा सासू व पतीने २२ सप्‍टेंबरला मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास तिला घराबाहेर हाकलून दिले. ती तिथून आई- वडिलांकडे आली. शारीरिक व मानसिक छळ करून दोघांनीही वेळोवेळी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत पल्लवीने म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी तिची सासू मीराबाई व पती प्रदीपविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार तात्याराव शिंदे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना

Latest News

सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
वैजापूर/पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सत्यनारायणाच्या पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून अपघात झाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी...
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
शिंदे गटाला सोबत घ्यावेच लागणार, पण ‘अटींचा’ भडीमार नको म्हणून भाजपच्या खेळ्या सुरू..., शहर-जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे काय म्हणाले...
२० वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून वारंवार लैंगिक अत्याचार, वाळूज MIDC तील रांजणगाव शेणपुंजीची घटना
शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगसेवकांनी पराभूत भाजप उमेदवाराच्या घरासमोर नाचवली तलवार!, विजयी रॅलीदरम्यान प्रभाग १८ मधील धक्कादायक प्रकार
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software