५ आरोपी कोर्ट आवारातून पळाले!; छ. संभाजीनगर जिल्हा कोर्टातील धक्कादायक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : न्यायालयीन कोठडीत रवानगी झालेले सहापैकी पाच आरोपी जिल्हा न्यायालयातून पळून गेले. पोलिसांना त्‍यांनी आम्ही परत येत नाही, असे सांगून टाकले. त्‍यामुळे वेदांतनगर पोलीस ठाण्यात त्‍यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून शोध सुरू झाला. पोलीस शोधत असल्याचे कळताच ते पुन्हा न्यायालयात हजर झाले. हा खळबळजनक प्रकार सोमवारी (२२ सप्‍टेंबर) दुपारी एकच्या सुमारास घडला.

पोलीस अंमलदार भाऊसाहेब बोर्डे यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते कोर्ट पैरवी म्हणून ड्युटी करतात. सोमवारी (२२ सप्‍टेंबर) सकाळी ११ पासून सायंकाळी ६ पर्यंत ड्युटीवर होते. दुपारी एकला त्यांना जिल्हा व सत्र न्यायदंडाधिकारी श्रीमती आर.डी. खेडकर यांनी न्यायालयीन दालनात बोलाविले. शेख मुनाफ शेख गुलाब (वय ३२), शेख जफीयाबी शेख मुनाफ (वय ३०), वाहेद खान अली खान पठाण, बाबा वाहेद खान पठाण (वय २२), जमीर खान वाहेद खान पठाण (वय २०), सुलतानाबी शेख बाबू (वय ४०), शेख मोईन शेख बाबू (वय २२, सर्व रा. हनुमान मंदिराजवळ, गारखेडा गाव) यांच्याविरुद्ध एकाला बेदम मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्‍न केल्याचा गुन्हा मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्‍यांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्‍यांची जामिनावर सुटका झाली होती. नंतर ते तारखांना वारंवार हजर राहिले नाहीत. अखेर न्यायालयाने जामिनदाराला आदेश देऊन सर्वांना न्यायालयात हजर करण्यास सांगितले. त्‍यामुळे सातही जण हजर झाले. न्यायालयाने त्‍यांची रवानगी हर्सूल कारागृहात केली.

पोलीस अंमलदार बोर्डे यांनी सर्व आरोपींना सायंकाळी सव्वा सहाला ताब्‍यात घेतले. न्यायालय येथील क्लर्क वखरे यांच्याकडून वॉरंट ताब्यात घेण्यासाठी गेले. तिथून परत आले असता शेख मुनाफ शेख गुलाब हाच हजर होता. बाकी सर्व पळून गेले होते. त्याने बाकीचे आरोपी कुठे गेले हे माहीत नसल्याचे सांगितले. बोर्डे यांनी आरोपींचा आजूबाजूला शोध घेतला. मात्र ते मिळून आले नाही. आरोपीचा नातेवाईक शेख समीर याने सर्व आरोपींना कॉल केला असता त्‍यांनी आम्ही परत येत नाही, असे स्पष्ट सांगितले. त्‍यानंतर नातेवाइकाने त्‍यांना समजावले, की न्यायालयाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल झाला तर पुन्हा कधीच बाहेर येता येणार नाही. तरीही ते ऐकण्यास तयार नव्हते. अखेर वेदांतनगर पोलीस ठाण्यात त्‍यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी शोध सुरू केला. ही बाब कळताच सर्व आरोपी पुन्हा स्वतः न्यायालयात हजर झाले. अधिक तपास पोलीस हवालदार बाळाराम चौरे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!

Latest News

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले! विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विट्स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर लुटारू सापळा लावून थांबलेले असतात. एकटेदुकटे कुणी...
UPSC मध्ये नवीन भरती सुरू, २ लाख रुपयांपर्यंत पगार, नोकऱ्यांसाठी पात्रता जाणून घ्या...
CUET PG करिता रजिस्ट्रेशन सुरू, परीक्षा मार्चमध्ये होणार, या गोष्टी लक्षात ठेवा...
१७,००० रुपयांच्या नोकरीवर मारली लाथ, आता वर्षाकाठी १७ लाखांची करताहेत उलाढाल!
३ दिवसांपासून पोटात अन्न-पाण्याचा कण नाही, वडगाव कोल्हाटीत उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती बिघडली, डॉक्टर म्हणाले, उद्या आणखी बिकट होईल स्थिती...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software