- News
- सिटी क्राईम
- छत्रपती संभाजीनगरात गुन्हेगार रिक्षाचालकांविरुद्ध पोलिसांची मोठी मोहीम; खुनाच्या घटनेनंतर जाग, ४४० र...
छत्रपती संभाजीनगरात गुन्हेगार रिक्षाचालकांविरुद्ध पोलिसांची मोठी मोहीम; खुनाच्या घटनेनंतर जाग, ४४० रिक्षाचालकांची कसून चौकशी!!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरात ४० टक्क्यांहून अधिक गुन्हेगार रिक्षा चालविण्याच्या व्यवसायात उतरल्याने त्यांच्याविरुद्ध सातत्याने कडक कारवाईची गरज आहे. तरुणींचा विनयभंग, हत्या, हाणामाऱ्या अशा घटना सातत्याने रिक्षाचालकांकडून घडत आहेत. काही दिवसांपूर्वी एका परीक्षार्थ्याची हत्या केल्याने रिक्षाचालकांविरुद्ध शहर वाहतूक पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. वाहतूक पोलीस आणि मुख्यालयातील अंमलदार यांनी मिळून मंगळवारी (१० […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरात ४० टक्क्यांहून अधिक गुन्हेगार रिक्षा चालविण्याच्या व्यवसायात उतरल्याने त्यांच्याविरुद्ध सातत्याने कडक कारवाईची गरज आहे. तरुणींचा विनयभंग, हत्या, हाणामाऱ्या अशा घटना सातत्याने रिक्षाचालकांकडून घडत आहेत. काही दिवसांपूर्वी एका परीक्षार्थ्याची हत्या केल्याने रिक्षाचालकांविरुद्ध शहर वाहतूक पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. वाहतूक पोलीस आणि मुख्यालयातील अंमलदार यांनी मिळून मंगळवारी (१० जून) तब्बल ४४० रिक्षाचालकांची कसून चौकशी केली. बेशिस्त रिक्षाचालकांना एकूण ६ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
गुन्हेगार रिक्षाचालकांमुळे सामान्य, प्रामाणिक रिक्षाचालक बदनाम होतात. त्यामुळे रिक्षाचालकांनीच आता आपल्या क्षेत्रातील गुन्हेगारी उखडून टाकण्याची गरज आहे. रिक्षाने प्रवास करणारा सामान्य वर्ग असतो. हाच फायदा अनेक रिक्षाचालक घेतात आणि प्रवाशांना भाड्यात लुटतात, जास्तीचे पैसे देण्यास नकार दिला अरेरावी, मारहाण करायला कमी करत नाहीत. काही गुन्हेगार रिक्षाचालक लूटमार करतात. तरुणी, महिलांसोबत गैरवर्तन करतात. मोठ्या आवाजात गाणे वाजवत सुसाट रिक्षा पळवतात. अनेकदा रिक्षांत वाजणारी गाणी महिला, तरुणींना लज्जा निर्माण करतात. विशेष म्हणजे हे सर्व वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिच्चून घडत असते. ऑनलाइन प्रक्रियेमुळे वाहतूक दंडाची भीतीच नाहीशी झाल्याचे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. अनेक रिक्षाचालक पोलिसांना दंड पाठवून द्या, असे म्हणत रिक्षा सुसाट दामटतात. त्यामुळे पोलिसांनी दंडापाठोपाठ आता खाक्याही रिक्षाचालकांना दाखविण्याची गरज आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
By City News Desk
महापालिका स्थायी समिती सभापतिपदी अनिल मकरिये, आज औपचारिक निवड
By City News Desk
हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीत सुधारणा!; रुग्णालयातून डिस्चार्ज
By City News Desk
Latest News
12 Mar 2026 20:36:06
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील गांधेली येथे मंगळवारी (१० मार्च) रात्री ९ च्या सुमारास हभप निवृत्ती...

