राजेंद्र जंजाळ-मंत्री शिरसाट यांच्यात उभी दरार; जंजाळ म्हणाले, शिरसाट पक्षाला बुडवतील!; शिरसाट म्हणाले, अति महत्वाकांक्षा वाढल्याने असे होते!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मनोज सांगळे : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरातील शिंदे गटाच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांत उभी दरार पडली आहे. मंत्री संजय शिरसाट यांच्यावर थेट टीका करत जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ दंड थोपटले आहेत. शिरसाट यांनीही त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. शिरसाट यांची वागण्याची पद्धत नक्कीच पक्षाला बुडवण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे, असा हल्लाबोल जंजाळ यांनी केला आहे, तर मंत्री शिरसाटांच्या म्हणण्यानुसार, जंजाळ यांना जिल्हाप्रमुख मीच केले. अतिमहत्वाकांक्षा वाढल्याने असे होते... एकूणच पुढील काळात दोघांतील शाब्दिक युद्ध चांगलेच पेटणार असल्याचे दिसत आहे.

राजेंद्र जंजाळ हे आक्रमक स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जसे संजय शिरसाट गेले, तसेच राजेंद्र जंजाळ हेही गेले. त्यांना जिल्हाप्रमुखपदी नियुक्‍तीही मिळाली. आतापर्यंत सावलीसारखे शिरसाटांच्या सोबत राहणारे जंजाळ एकाएकी आक्रमक का झालेत, अशी चर्चा सुरू झाली आहे. यामागची अनेक कारणे समोर आली आहेत. महापालिका निवडणुकीच्या तयारीत त्यांना फारसे महत्त्व दिले जात नसल्याची चर्चा आहे. जंजाळ यांच्याऐवजी आता आता पक्षात आलेल्या नंदकुमार घोडेले, त्र्यंबक तुपे, विकास जैन आणि किशनचंद तनवाणी यांना महत्त्व दिले जात असल्याचे बोलले जाते. त्यामुळे जंजाळ हे भाजपात जाणार असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. जंजाळ यांच्याकडून शिरसाटांवर आरोप झाले नव्हते. पण आज, २६ नोव्‍हेंबरला त्यांनी थेट शाब्दिक हल्ला चढवला आहे.

राजेंद्र जंजाळ म्हणाले, की महापालिका निवडणुकीच्या नियोजनासाठी बैठका घेतल्या जातात, त्या बैठकांमधून मला डावलले जात आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केले, तेव्हा आम्हाला माहीत नव्हते की ते कोणत्या पदावर राहतील. परंतु आम्ही तेव्हापासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत. एकनाथ शिंदे यांनी मला जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी दिली. मी चांगले काम केले. पक्षाला यश मिळाले, असे जंजाळ म्हणाले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अनेक कार्यकर्ते पक्ष सोडून गेले. शिरसाट यांची वागण्याची पद्धत याला कारणीभूत आहे. विधानसभा निवडणूक होती तेव्हा तुम्हाला सर्वजण पाहिजे होते. आज तुमचे काम झाले म्हणून आम्ही तुम्हाला नको वाटत आहोत. हे कुठेतरी चुकीचे आहे. त्यामुळे नुकसान पक्षाचे होणार आहे. मी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्याशी बोलणार आहे.

राजकारण माझा व्यवसाय नाही, की राजकारणामुळे माझे घरही चालत नाही. राजकारण माझा छंद आहे. स्वाभिमान गहाण ठेवून राजकारण करू नका ही बाळासाहेबांची शिकवण असून, त्या शिकवणीनुसार वागण्याचा प्रयत्न मी केला आहे. स्वाभिमान गहाण ठेवून ज्या दिवशी मला राजकारण करावे लागेल, त्या दिवशी मी राजकारण सोडून देईल, असे जंजाळ म्हणाले. शिरसाट यांनी कोणाला घेऊन बसावं हा त्यांचा अधिकार असला तरी पक्ष संघटना म्हणून पक्षाच्या बैठकांना जिल्हाप्रमुख असलाच पाहिजे. पक्षासाठी सर्व काही पणाला लावून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच बाजूला केले जात आहे. जे आपल्या विरोधात लढले, त्यांनाच आता जवळ केले जात आहे. त्यामुळे आमच्यावर अन्याय होतोय. एकटे पालकमंत्री जिल्ह्याची शिवसेना चालवत आहेत, असा गंभीर आरोपही जंजाळ यांनी केला.

मंत्री शिरसाट यांचे प्रत्युत्तर...
दरम्यान, राजेंद्र जंजाळ यांनी केलेल्या आरोपांना मंत्री संजय शिरसाट यांनी अत्यंत शेलक्या शब्दांत प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, की राजेंद्र जंजाळ विद्वान आहेत. त्यांचे आता तक्रार करण्याचे कारण मला माहीत आहे. ते कशासाठी सगळीकडे बोंबलत फिरत आहेत याची उत्तरे मिळतील. त्यांना जिल्हाप्रमुख मी केले. अतिमहत्वाकांक्षा वाढल्याने असे होते. पण मनाची नाही तर जनाची लाज वाटली पाहिजे. कुठे जायचे असेल त्यांनी जावे. इतर पक्षांतून आलेले लोक तुम्हाला चालत नाहीत, अशाने पक्ष चालत नाही. सर्वांना सामावून घेऊन चालावे लागते. जिल्हाप्रमुखाचे अधिकार त्यांना कळत नाहीत, असे शरसंधान शिरसाट यांनी साधले.

जंजाळ कुठे जातील? 
एकूणच राजकीय परिस्थिती पाहता राजेंद्र जंजाळ हे पक्ष सोडणार हे जवळपास निश्चित झालं आहे. मग अशा परिस्थितीत ते कुठे जाणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. ते उद्धव गटात येतील का, की भाजपमध्ये जातील, अशी चर्चा सुरू आहे. भाजपमध्ये ते जातील, अशी दाट शक्यता दिसून येत आहे. जंजाळ यांनी शिरसाटांवर टीका करणे आता त्यांचा पक्षातील विषय असल्याने मी त्यावर जास्त बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Latest News

इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : १९ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गारखेड्यातील इंदिरानगरात शनिवारी...
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
छत्रपती संभाजीनगर हादरले!; सेवानिवृत्त प्राध्यापकाची गोळी झाडून हत्या, रीलस्टारसह तिघांना अटक, उसणे ५० लाख परत न करण्यासाठी घडवले हत्याकांड
बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software