ठाकरे गटाच्या महिला सरपंच असल्याने प्रशासनाकडून दुजाभाव?, मावसाळाच्या राजेश्री देवगिरीकर यांनी राजीनामा दिल्याने खळबळ

On

खुलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) : खुलताबाद तालुक्‍यातील मावसाळा येथील सरपंच राजेश्री अतीश देवगिरीकर यांनी यांनी बुधवारी (६ ऑगस्ट)  तडकाफडकी राजीनामा देत प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. मी ठाकरे गटाची कार्यकर्ती असल्यानेच मावसाळा गावाबाबत शासन, प्रशासनाकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप त्‍यांनी केला आहे. त्‍यामुळे खळबळ उडाली आहे. खुलताबादच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे राजेश्री यांनी राजीनामा सुपूर्द केला.

राजेश्री देवगिरीकर यांनी म्हटले आहे, की खुलताबाद तालुक्यात अनेक वर्षांपासून सत्ताधारी पक्षाच्या लोकांचीच कामे केली जात असून, विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांची कामे दुर्लक्षित केली जात आहेत. मावसाळाच्या समस्या अन्‌ मागण्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत. प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्याचा परिणाम गावाच्या विकासावर झाला आहे. मी ठाकरे गटाची असल्यानेच शासन आणि प्रशासनाकडून दुजाभाव होत आहे. प्रशासन गावाच्या समस्या सोडवत नसल्याने आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा ठरावही ग्रामस्थांनी मंगळवारी (५ ऑगस्ट) ग्रामसभेत घेतला आहे. मात्र या ग्रामसभेलाही जिल्हा परिषदेच्या विविध अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दांडी मारली, असा आरोप राजेश्री देवगिरीकर यांनी केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वास्तुशास्‍त्र : घराची बाल्कनी सकारात्मक उर्जेचा स्रोत

Latest News

वास्तुशास्‍त्र : घराची बाल्कनी सकारात्मक उर्जेचा स्रोत वास्तुशास्‍त्र : घराची बाल्कनी सकारात्मक उर्जेचा स्रोत
वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून घराची बाल्कनी महत्त्वाची आहे. बाल्कनी वास्तुशास्त्रानुसार बांधली गेली असेल आणि त्याची देखभाल देखील वास्तु सूचनांनुसार केली गेली असेल,...
Tech News : चुकूनही गुगलवर सर्च करू नका या ४ गोष्टी अडचणीत सापडाल, तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते...
सुनील पाटील पैठणचे नवे SDPO, अवैध धंदेवाल्यांवर फास आवळणार
रक्षाबंधनासाठी घरी येताना भरधाव पिकअपची धडक, दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्‍यू, वैजापूर तालुक्‍यातील दुर्घटना
लग्‍नासाठी आलेल्या पाहुण्याचा नागडोहात बुडून मृत्‍यू, कन्‍नडची घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software