छत्रपती संभाजीनगर भाजप महिला मोर्चाची कार्यकारिणी बरखास्त होणार!; दोन पदाधिकाऱ्यांच्या ‘फ्रीस्टाईल’मुळे मोठा निर्णय होणार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भाजप महिला मोर्चाच्या २ पदाधिकाऱ्यांनी एकमेकींच्या झिंज्या उपटल्यानंतर हे प्रकरण पक्षाच्या वरिष्ठांनी खूपच गांभीर्याने घेतले आहे. बुधवारी (३१ जुलै) दुपारी आयएमए हॉलच्या प्रांगणात ही फ्रीस्टाईल हाणामारी झाली होती. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली असून, येत्या आठवड्यात महिला मोर्चाची पूर्ण शहर कार्यकारिणीच बरखास्त करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाच्या […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भाजप महिला मोर्चाच्या २ पदाधिकाऱ्यांनी एकमेकींच्या झिंज्या उपटल्यानंतर हे प्रकरण पक्षाच्या वरिष्ठांनी खूपच गांभीर्याने घेतले आहे. बुधवारी (३१ जुलै) दुपारी आयएमए हॉलच्या प्रांगणात ही फ्रीस्टाईल हाणामारी झाली होती. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली असून, येत्या आठवड्यात महिला मोर्चाची पूर्ण शहर कार्यकारिणीच बरखास्त करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाच्या वरिष्ठ नेत्‍यांनी दिली.

भाजप महिला मोर्चाच्या दोन गटांतील वाद अगदीच टोकाला गेल्याचे बुधवारी पहायला मिळाले. सध्या या प्रकरणावर कुणीही बोलण्यास तयार नाही. घरातील भांडण आहे, कुणातही काही वाद नाही, असे सांगून पडदा टाकण्याचा प्रयत्‍न करण्यात येत आहे. मात्र येत्या आठवड्यात पूर्ण कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी गठीत करण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्याचे समोर येत आहे. हा पक्षातील अंतर्गत वाद असून, सामंजस्याने निर्णय घेण्यात येईल, असे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी पत्रकारांना सांगितले.

भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी सांगितले, की भाजप हा शिस्तप्रिय पक्ष आहे. झाल्या घटनेबद्दल दोघींशीही चर्चा करणार आहोत. राजकारणात स्पर्धा, ईर्षा असतात. आम्ही दखल घेतली आहे. आमच्या दृष्टीने हा विषय संपला आहे. कुणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही. दरम्यान, माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले जात असून, ज्यांना पक्षात पदे दिली त्याच पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसत आहेत याचे वाईट वाटते. आरोप करणाऱ्यांनी त्याचे पुरावे द्यावेत, असे महिला मोर्चा शहराध्यक्षांनी म्‍हटले असल्याचे वृत्त एका प्रसिद्ध दैनिकाने दिले आहे.

काय घडलं होतं…
सध्या भाजपकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. यानिमित्ताने राज्य विस्तारकांचा वर्ग आयएमए हॉलमध्ये राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, संघटनमंत्री रघुनाथ कुलकर्णी, विभागीय संघटन मंत्री संजय कौडगे यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. राज्यातील १४० विस्तारक उपस्थित होते. भाजप महिला मोर्चाच्या शहर सरचिटणीस महिलेने शहराध्यक्षांनी आपल्याकडून अडीच लाख रुपये हातउसणे घेतल्याचे सांगून त्‍या आता आपला फोन उचलत नसल्याची तक्रार प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे केली. तेवढ्यात शहराध्यक्षा तिथे आल्या.

बावनकुळे यांनी दोघींचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर हॉलमधून परतत असताना शहराध्यक्षांनी सरचिटणीस महिलेला पकडले आणि मारहाण केली. दोघींकडून जोरदार शिवीगाळ करत हाणामारी झाली. अन्य महिला पदाधिकाऱ्यांनी त्‍यांचे भांडण सोडले. यात एकीच्या चेहऱ्यावर तर दुसरीच्या हाताला जखमा झाल्या आहेत. हा प्रकार बावनकुळे यांना कळताच त्‍यांनी जालिंदर शेंडगे यांना दोघींकडे पाठविले. मात्र तोपर्यंत दोन्ही गट क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. शेंडगे आणि हर्षवर्धन कराड यांनी सगळा प्रकार काय आहे, हे समजून घेऊन वरिष्ठांना सांगण्यात येईल, त्यानंतर कारवाईचा निर्णय होईल, असे सांगत दोघींची समजूत काढली. त्‍यामुळे पोलिसांत तक्रारी दाखल झाल्या नाहीत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

"हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!!

Latest News

"हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!! "हे महिलांचे काम नाही...’ म्हणणाऱ्यांना दाखवला दम!; आता लाखो कमावते, प्रत्येक जण झालाय थक्क!!
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील रहिवासी सकिना ठाकूर हिने कमालच केली आहे. तिने रूढीवादी विचारसरणीला आव्हान आणि ग्रामीण उद्योजकतेचे एक नवीन...
एफआयआर किंवा कोर्ट केस होऊनही सरकारी नोकरी मिळू शकते का? नियम काय म्हणतात...
स्किन राहील तरुण, सुरकुत्या होतील नाहीशा, घरगुती क्रीम बनवा अन्‌ २ आठवड्यात पहा कमाल!
चार मानवी दोष, जे एखाद्याला यशाच्या मार्गापासून नेतात दूर...
अहंकार अन्‌ निष्काळजीपणामुळेच नंतर माझे चित्रपट चालले नाहीत...; प्रसिद्ध निर्माते-दिग्ददर्शक रामगोपाल वर्मा यांची विशेष मुलाखत
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software