पत्‍नीच्या विजयाला पतीचे आव्हान, हर्षवर्धन जाधवही EVM विरोधात आक्रमक, व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या मोजण्याची मागणी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभेच्या कन्‍नड मतदारसंघात पत्‍नी संजना जाधव यांचा झालेला विजय पती हर्षवर्धन जाधव यांना रुचलेला, पटलेला नाही. त्‍यांनीही ईव्हीएमवर संशय घेत व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या मोजण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. यापूर्वी छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार राजू शिंदे आणि अन्य एका उमेदवाराने अशीच मागणी प्रशासनाकडे केलेली आहे. निकाल लागून आठवडा […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभेच्या कन्‍नड मतदारसंघात पत्‍नी संजना जाधव यांचा झालेला विजय पती हर्षवर्धन जाधव यांना रुचलेला, पटलेला नाही. त्‍यांनीही ईव्हीएमवर संशय घेत व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या मोजण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. यापूर्वी छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार राजू शिंदे आणि अन्य एका उमेदवाराने अशीच मागणी प्रशासनाकडे केलेली आहे.

निकाल लागून आठवडा होत आला तरी पराभूत उमेदवारांना जनकौल मान्य झालेला दिसत नाही. त्‍यांनी ईव्हीएम मतमोजणीवर आक्षेप घेतला असून, वेगवेगळे आरोप करून संशयाचे वातावरण निर्माण केले आहे. त्‍यांचे समर्थक झालेले मतदान, मोजलेले मतदान यातील फरक व्हायरल करत आहे. तीन उमेदवारांनी व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या मोजा, ईव्हीएमचा डेमो दाखवू नका, अशी मागणी केली आहे. पश्चिम मतदारसंघातील राजू शिंदे हे शिंदे गटाचे संजय शिरसाट यांच्याकडून पराभूत झाले आहेत, तर कन्नडमधील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव हे शिंदे गटाच्या उमेदवार संजना जाधव यांच्याकडून पराभूत झाले आहेत.

संजना जाधव यांनी हर्षवर्धन जाधव व मावळते आमदार तथा ठाकरे गटाचे उमेदवार उदयसिंह राजपूत या दोन दिग्गजांना धूळ चारली. संजना जाधव यांना एकूण ८४,४९२ मते मिळाली, तर हर्षवर्धन जाधव यांना ६६,२९१ मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर उदयसिंग राजपूत यांना ४६,५१० मते मिळाली. पती-पत्नी एकमेकांविरोधात उभे असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या लढतीकडे लागले होते. त्यांनी पती हर्षवर्धन जाधव यांचा १८ हजार २०१ मतांनी पराभव केला. राजू शिंदे यांनी काही भागातील ठराविक मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या मोजण्याची मागणी केली आहे.

काय असते प्रक्रिया…
पुन्हा मतमोजणीसाठी अर्ज आला की जिल्हा प्रशासनाकडून ते निवडणूक आयोगाकडे पाठवतात. राज्यातील सर्व अर्जांवर आयोगाला ३० दिवसांत निर्णय घ्यावा लागतो. त्‍यानंतर भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड अर्थात भेल या कंपनीकडे अर्ज जमा केले जातात. एखाद्या प्रकरणात न्यायालयात याचिका दाखल झाली असेल तर न्यायालयात अर्ज करून आयोगाला ईव्हीएम तपासणीची परवानगी मागावी लागते. जिथे न्यायालयात प्रकरण नाही,

तिथे निवडणूक आयोग निर्णय घेऊन वेळापत्रक ठरवते आणि केंद्रनिहाय ईव्हीएम बाहेर काढून त्या पुन्हा तपासणीसाठी आणतात. ही प्रक्रिया मोफत होत नाही. यासाठी पुन्हा मोजणीची मागणी करणाऱ्यांना ४७ हजार २०० रुपये १८ टक्के जीएसटीसह कोषागार विभागात चालानसह भरावे लागतात. यासाठीही निकषक आहेत, निकाल जाहीर झाल्यानंतर क्रमांक दोन व तीनवर असलेल्या उमेदवारांनाच मतमोजणी आक्षेपाबाबत ७ दिवसांत जिल्हा प्रशासनाकडे अर्ज द्यावा लागतो. ५ टक्के ईव्हीएमचीच तपासणी होते. एखाद्या मतदारसंघातून दोन उमेदवारांनी मागणी केली तर अडीच-अडीच टक्के ईव्हीएमची तपासणी त्‍यांच्यासाठी होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कल्पनाची ‘तोतयेगिरी’; ७ लाख ८५ हजार देणारा रियल इस्टेट एजंट दत्तात्रय शेटेला अटक!

Latest News

कल्पनाची ‘तोतयेगिरी’; ७ लाख ८५ हजार देणारा रियल इस्टेट एजंट दत्तात्रय शेटेला अटक! कल्पनाची ‘तोतयेगिरी’; ७ लाख ८५ हजार देणारा रियल इस्टेट एजंट दत्तात्रय शेटेला अटक!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : तोतया आयएएस अधिकारी कल्पना त्र्यंबकराव भागवत (वय ४५, रा. चिनारगार्डन, पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) हिच्या...
सेंट्रल नाक्यावर नायलॉन मांजाने चिरला ३ वर्षीय चिमुकल्याचा गळा!
राजनगरमध्ये मध्यरात्री हल्लकल्लोळ! टवाळखोराने जाळल्या ५ दुचाकी!!
हर्सूल टी पॉइंटवर हिट ॲन्ड रन; दुचाकीस्वाराला उडवून कार पसार... 
सराफा व्यापाऱ्यावर ४ टवाळखोरांचा प्राणघातक हल्ला, दारू पिण्यासाठी पैसे मागत लाकडी दांड्याचे वार, व्यापारी जखमी, हडको एन ११ मधील खळबळजनक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software