- News
- पॉलिटिक्स
- दानवेंसोबतच्या भांडणामुळे सिल्लोडमध्ये भाजप सत्तारांच्या विरोधात; सत्तारांनी धमकीच दिली…
दानवेंसोबतच्या भांडणामुळे सिल्लोडमध्ये भाजप सत्तारांच्या विरोधात; सत्तारांनी धमकीच दिली…
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्यातील संघर्ष चांगलाच पेटला आहे. आधी सत्तार समर्थकांनी दानवेंविरुद्ध मोर्चा काढला, नंतर दानवे समर्थकांनी सत्तारांविरुद्ध मोर्चा काढला. भाजपने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे सत्तारांपुढे संकट निर्माण झाले आहे. शिंदे गट आणि भाजपची युती असली तरी बंडखोरीचीही शक्यता निर्माण झाली आहे. सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील भाजपला मानणारा […]
सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्यातील संघर्ष चांगलाच पेटला आहे. आधी सत्तार समर्थकांनी दानवेंविरुद्ध मोर्चा काढला, नंतर दानवे समर्थकांनी सत्तारांविरुद्ध मोर्चा काढला. भाजपने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे सत्तारांपुढे संकट निर्माण झाले आहे. शिंदे गट आणि भाजपची युती असली तरी बंडखोरीचीही शक्यता निर्माण झाली आहे. सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील भाजपला मानणारा मतदार दुरावण्याची शक्यता लक्षात येताच सत्तारांनी भाजपला आज, ३ ऑक्टोबरला अक्षशः धमकीच दिली. सिल्लोडमध्ये भाजपाने विरोध केला तर शिवसैनिक महाराष्ट्रात भाजपाला जशास तसे उत्तर देतील, असा इशारा सत्तार यांनी भाजपाला दिला आहे.
आपल्यावर टीका करणाऱ्यांचा आगामी विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ करणार, असा इशारा सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांना दिला. आगामी विधानसभा निवडणुकीत माझा राज्यातील पहिल्या पाच विजयी उमेदवारांत नंबर असेल, असा दावाही त्यांनी कंकराळा येथील विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला सिल्लोड-सोयगाव मतदारसंघ हवा आहे. हा मतदारसंघ आपल्या पक्षाला सोडवून घ्यावा, अशी मागणी ज्येष्ठ नेते रंगनाथ काळे रविवारी शरद पवार यांची भेट घेऊन केली. हा मतदारसंघ आधी काँग्रेसकडे होता. गेल्या निवडणुकीत सत्तारांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली. नंतर ते शिंदे गटात गेले. आता महाविकास आघाडीत हा मतदारसंघ ठाकरे गटाला सुटणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे रंगनाथ काळे यांनी बारामतीला जाऊन शरद पवारांची भेट घेत दोन तास यावर चर्चा केली. पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे काळे यांनी पत्रकारांना सांगितले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
15 Mar 2026 21:11:45
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...

